उदयगिरी महाविद्यालयात गुणवत्तेचा खजिना – रमेशअण्णा अंबरखाने

0
उदयगिरी महाविद्यालयात गुणवत्तेचा खजिना - रमेशअण्णा अंबरखाने

उदगीर (एल पी उगिले): महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे विविध क्षेत्रांमध्ये पुढे असलेले एक शैक्षणिक संकुल आहे. यशाचे दुसरे नाव म्हणजे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आहे. उदयगिरीत गुणवत्तेचा खजिना आहे, असे मत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी कल्याण मंडळ उद्घाटन व नगरसेवक तसेच विविध विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी व्यासपीठावर म. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष माधवराव नौबदे, तसेच कार्यकारणी सदस्य मल्लिकार्जुन मानकरी, श्रीकांत मध्वरे, मन्मथ बिरादार, आडेप्पा अंजुरे, नाथराव भंडे, शिवराज वल्लापुरे, भीमाशंकर मुद्दा, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, प्रा. एस. जी. कोडचे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. सुरेश लांडगे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना अंबरखाने म्हणाले संशोधनामध्ये नवनवीन संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. परिश्रमाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. आपल्या कार्यातून इतिहास निर्माण व्हावा. अशा स्वरूपाचे काम आपण करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. केवळ मार्कवान नव्हे तर गुणवान पिढी निर्माण करण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ आवश्यकच आहे. विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्ये रुजवली जातात. त्यामुळे सर्वांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा नवनिर्वाचित नगरसेवक चंदन पाटील नागराळकर, चाऊस उमर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उन्हाळी 2025 च्या विद्यापीठस्तरीय परीक्षेत विविध विषयांमध्ये प्रथम, द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार डॉ. सुरेश लांडगे यांनी मानले. विद्यार्थी कल्याण मंडळ उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक-कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!