वृक्षाची आई वडीलासारखे संगोपन करू – सयाजीराव शिंदे

वृक्षाची आई वडीलासारखे संगोपन करू - सयाजीराव शिंदे

झाडांचे शतक! शतकांसाठी झाड हा सह्याद्रि देवराई चा कार्यक्रम नागराळ मध्ये साजरा

नागराळ (रामेश्वर बिरादार) :  स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून नागराळग्राम पंचायत तर्फे झाडांचे शतक! शतकांसाठी झाड, हा सह्याद्रि देवराई चा कार्यक्रम पार पाडण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली व त्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक वयाचे 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी  निसर्गप्रेमी,सिनेअभिनेता सह्याद्री देवराई चे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव शिंदे यांनी नागराळकरांना एक मोलाचा संदेश देत म्हणाले की, आपणास जगण्यासाठी सर्वात मोठे साधन म्हणजे ऑक्सिजन आहे. हेच आपण निर्माण करू व गावात वृक्ष लागवडीचे शतक पूर्ण करू. त्या वृक्षांसोबत आपलं शतक ही पूर्ण करू, आपन जे वृक्ष लागवड करू त्या वृक्षांच संगोपन आपण आपल्या आई वडीलासारखे करू. अभंगरुपी काव्यातूनमधून एक संदेश देत म्हणाले की “ऐसी लेखणी घेऊन सोबती! माती जमा करून!त्या मातीत पाणी ओतूनि! त्या मातीचा गोळा करूनि! त्या गोळ्यास लाथा घालूनि! त्यात पीक घेऊनि वृक्ष लावूनी!त्या वृक्षाची लाकूड फाटा घेऊनी!त्याचाच छपर बनऊनी! स्वतः ला राहण्यासाठी सावली बनवुनी!!!! सावलीसाठीचे वृक्ष सावली साठीच वापरणे हीच खरी वृक्षाची देण म्हणत  झाड लाव झाड लाव आई साठी झाड लाव, बापासाठी झाड लाव, बायको साठी झाड लाव, मूलबाळ साठी झाड लाव, झाड लाव म्हणत ते थांबले” प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी गावाचा विकास होण्यासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. व दुष्काळ पडू देणार नाही असे आश्वासन दिले.  गावातून वृक्ष दिंडी घेऊन नागराळ फॉरेस्ट डिपार्टमेंट हद्दीतील  वनीकरण विभागतील वनात तिरंगा ध्वज फडकविला. वृक्ष लागवड करून पत्रकारांशी संवाद साधला. त्या नंतर दिलीप पाटील नागराळकर यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रम सांगता केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचटनिस बसवराज पाटील नागराळकर,मल्लिकार्जुन मानकरी,रमेश आण्णा आंबरखाने,चंद्रकांत आण्णा वैजापुरे, शिवाजी मुळे, श्रीकांत पाटील, शरण लुल्ले, कपिलकुमार बिरादार, डोंगरगे सीध्देश्वर आप्पा नागराळकर, अनिल इंगोले, अनिल कांबळे, सरपंच विष्णू ऐनिले,उपसरपंच रतन पाटील, ग्रामसेवक ईश्वर मुर्के,ग्रामपंचायत सर्व सदस्य, रामेश्वर बिरादार, गिरीधर गायकवाड, भास्कर चामले, दयानंद कांबळे, मदार शेख, सुरेश गौडगावे, पंढरपुरे रत्नदीप व  गावातील नागरिकांसह बाहेर गावातील हजारो नागरिक या कर्यक्रमासाठी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!