युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन

0
युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन

सातारा (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील धनाजी कराडे यांच्या ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कवितासंग्रहाचे सातारा येथे 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी केले.
यावेळी संमेलनाचे उद्घाटक ह. भ. प सुहास फडतरे, संमेलनाध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोनाझरीया मिंझ, स्वागतातध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर, कॉम्रेड धनाजी गुरव, ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कविता संग्रहाचे कवी धनाजी कराडे, वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा स्वाती कराडे, डॉ. संतोष भोसले डॉ. किरण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभ पार पडला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!