पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे महिलानी पोस्टकार्डातून मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे महिलानी पोस्टकार्डातून मानले आभार

यवतमाळ (राम जाधव) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यात प्रारंभ करण्यात आला होता . त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित तालुका महागाव येथील भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने अभियान राबविण्यात आले.

या अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबविले असून देशाचेदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यात प्रारंभ करण्यात आला होता . त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित तालुका महागाव येथील भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने अभियान राबविण्यात आले.

माननीय पंतप्रधान यांच्या विकास योजनेतील लाभार्थी महिला यांनी अभिनंदन पोस्टकार्ड लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पाठवले व सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले असून पंतप्रधान घरकुलाचे लाभ, शौचालय बांधण्यासाठी योजना आणली. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान पेन्शन योजना चालू केली. कोरोना महामारीच्या काळात स्वस्त धान्य मोफत दिले अशा तसेच महिलांसाठी अनेक योजनाचा आधार गरीब महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला असून मोदीजीचे भाजपा महिला मोर्चा महागाव आघाडीच्या वतीने पोस्ट कार्ड पाठवून आभार मानले. यावेळी भाजपच्या महिला नेत्या जिल्हा उपाध्यक्ष सौ छाया खंदारे, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा तथा तीवरंगच्या सरपंचा सौ जयश्री सुनील राठोड,प्रिया शिंदे, आशा साबळे, सुनीता गुंफा,तुळसा चव्हाण, कांता जाधव, लीला जाधव, सिंधू जाधव, यशोदाबाई सावळे, सीता सोळंके इत्यादी सह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!