72 तासात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य द्या अन्यथा तीव्र आंदोलन – बाळासाहेब पाटोदे

72 तासात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य द्या अन्यथा तीव्र आंदोलन - बाळासाहेब पाटोदे

 उदगीर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गावातील शेतीसुद्धा खरवडून गेली आहे. त्यामुळे पिकासोबत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, आणि हे नुकसान न भरून येणारे असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य करावे. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे युवानेते तथा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला रीतसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिले असून शासनाने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांना अर्थसाह्य करावे. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भात मदत तर करावीच करावी, त्याशिवाय शासनाने हेक्‍टरी 50 हजार रुपये अर्थसाह्य द्यावे. अशी ही आग्रही मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

 उदगीर परिसरातील शेतकऱ्यांची तर फार मोठी गोची झाली आहे. सुरुवातीला पावसाने दिलेली ताडन त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिके वाळून जात होती. त्यात पुन्हा झालेली अतिवृष्टी त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक गेले आहे. कित्येक ठिकाणी सोयाबीन पीक काढणे सुद्धा शेतकऱ्याला न परवडणारे झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला धीर देऊन पुन्हा उभारी घेण्याची शक्ती यावी. या दृष्टीने शासनाने मदत करणे गरजेचे आहे. नैतिक जबाबदारी समजून शासनाने 72 तासाच्या आत आर्थिक मदत द्यावी. जेणे करून शेतकऱ्याचे सण साजरे होतील. कित्तेक शेतकऱ्यांनी या पिकाच्या आधारावर आपल्या घरच्या लग्न कार्याचे स्वप्न पाहिले होते, कित्तेक शेतकऱ्यांना या पिकाच्या आधारावर आपण कर्ज फेडू अशी आशा वाटत होती. मात्र निसर्गाने घाला घालून शेतकऱ्याला अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने पालकत्वाची भूमिका घेऊन शेतकऱ्याला जगवणे गरजेचे आहे. असे विचार बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यात हलगर्जीपणा केल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असेही त्यांनी सांगितले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!