फुले महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उल्लेखनीय – मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

फुले महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उल्लेखनीय - मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले महाविद्यालयाने ग्रामीण भागातून जिल्ह्यातच नव्हे तर विद्यापीठ स्तरावर गुणवत्तेचा दर्जा उंचावणारे वाढवणारे अध्यापन कार्य करून अहमदपूरच्या लौकिकात भर टाकून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उल्लेखनीय असल्याचे सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांचा ४नोव्हें. रोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी व महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात आमदार ते राज्यमंत्री हा जीवन प्रवास उलगडून दाखवला. रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना आलेले अनुभवही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच महात्मा फुले महाविद्यालयाने अल्पावधीत केलेल्या नेत्रदीपक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील आणि सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी पत्रकार अहमद तांबोळी यांचाही सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मा. बाळासाहेब जाधव यांनी आपल्या कार्याने उदगीर, अहमदपूर परिसराचा कायापालट केला आहे , त्यांना या भागाचे भाग्यविधाते म्हटले जाते. या लोकनेत्याची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले, हा खऱ्या अर्थाने विद्यापीठाचाच सन्मान आहे असेही म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर व्यक्त केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!