ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून जवळगा जिल्हा परिषद शाळेचा कायापालट

ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून जवळगा जिल्हा परिषद शाळेचा कायापालट

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवळगा शाळेत गुणवत्तेसोबत शाळेची इमारत ही बोलकी करून जवळगा प्रशाला बाला उपक्रमाने नटत आहे ,लातूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे विद्यार्थ्यांना विषयाचे संपूर्ण ज्ञान होऊन प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा हे बाला उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. इमारतीला आधार देणारे खांब (पीलर) आता ज्ञान देणारे स्तंभ झाले आहेत भिंती विविध उपक्रम, चित्रे, नकाशा, डॉटबॉर्ड, सुविचार,म्हणी, विद्यार्थ्यांना लिहण्यासाठीचे फलक, उंची मोजण्याचे साधन, या आणि अशा विविध बाबींनी सजली आहे,जवळगा प्रशालेची स्थापना वर्ष १९५१ची असून एकूण १२शिक्षक कार्यरत तर शाळेचा पट ३३८ आहे
प्रशालेत LED प्रोजेक्टर व smart TV चा व ICT-LAB चा E- learning साठी वापर केला जातो, दैनिक परिपाठमध्ये विद्यार्थी वाढदिवस हा भेटवस्तू देऊन नियमित साजरा केला जातो.
सदरील शाळाही १९५१ चे असल्यामुळे या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात गुणवत्तेमुळे खाजगी शाळांची स्तोम माजले असतानाही जिल्हा परिषद शाळे कडे विद्यार्थ्यांसह पालकांचा ओढा पाहून जवळगा ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन १५ व्या वित्त आयोगातून सुमारे दोन लक्ष ५० हजार रुपये खर्चून रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत त्याच बरोबर आता विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी अद्यावत असे शौचालय उभारण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे त्यास मंजुरी मिळताच या बांधकामाची प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच हनुमंत बिरादार यांनी दिली,
पालक प्रतिक्रिया संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य यशवंत सोनकांबळे, बालाजी पाटोळे, सिंध्दार्थ पाटोळे,
जवळगा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने किंवा शिक्षण विभागाच्या वतीने जलशुद्धीकरण यंत्र उभारण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळेल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण समितीचे यशवंत सोनकांबळे यांनी व्यक्त केली,
शिक्षक निधीतून अद्ययावत ग्रंथालय करण्याचे नियोजन असल्याचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र चौहान यांनी सांगितले तसेच सरपंच श्री हणमंत बिरादार व ग्रामसेवक विनोद खरात यांच्या पुढाकाराने बाला उपक्रमास गती मिळाली,तसेच शाळेस पालकांनी लोकवाटा निधी द्यावा असे मुख्याध्यापक ,शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य ,यांनी आवाहन केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!