ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी !

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी !

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मुक्कावार मॅडम, श्री भोळे सर, लिमये सर,देबडवार सर तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण विषयक कार्याची माहिती प्रभावीपणे कु लाला रक्षिता,नामवाड संस्कृती, मानसी जाधव, रागिनी ढगे विद्यार्थ्यांनी भाषणांमधून सर्वांना दिली.,
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थिनी वैष्णवी चंदे, जान्हवी बिरादार,श्रुती देवणे,रागिनी दहिफळे,बलुले वैष्णवी इत्यादी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व शिक्षण विषयक कार्याची माहिती श्री भोळे सर,श्रीमती मंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर भाषेत दिली.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर यांनी क्रांतीज्योती, शिक्षणाची गंगोत्री, पहिल्या महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले यांचा स्त्री शिक्षणाचा वसा अविरतपणे यापुढेही चालू ठेवूया, समाजातील कोणीही निरक्षर राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू., असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रोडगे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!