विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सूरू करा..!
सजग पालक नागरीक संघाची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरसकट बंद केलेल्या शाळा तातडीने चालू कराव्यात अशी आग्रही मागणी सजग पालक नागरीक संघा व सम्राट मित्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत.या निर्बंधामध्ये सरसकट शाळा बंद केल्या आहेत.तसेच इयत्ता दहावी आणी बारावी चे वर्ग सूरू करण्यास परवानगी दिली आहे.वास्तवीक ज्या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण नाहीत तीथे शाळा चालू करण्यास कांही गैर नाही.विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सूरू ठेवाव्यात.ऑनलाईन शाळा सूरू ठेवन्यात मोठी अडचण असून असंख्य पालकांकडे मोबाईल नाही,कूठे नेटवर्कची समस्या आहे. चित्रपट गृह,नाट्यगृह,धार्मिक जागा,माॅल्स,हाॅटेल या सगळ्यांना 50 टक्के उपस्थितीत परवानगी असताना शाळा सरसकट बंद का करण्यात येत आहेत…?ऑनलाईन शिक्षण सर्वांना सोयीचे नसून प्रत्येक्ष वर्गात बसून शिक्षण घेणे हाच शिक्षणाचा योग्य मार्ग आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन,वाचन तसेच गणित विज्ञान या सारख्या विषयाच्या आकलनात उणीवा रहाणार आहेत.करिता एकदिवसाआड शाळा भरविने,शाळेची वेळ कमी करणे,विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून शिक्षण देणे,ग्रामीण भागातील शाळा सूरू ठेवने आदी पर्यायाचा शासनाने विचार करून तातडीने शाळा चालू कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,ज्ञानोबा भोसले,शंकरराव अबरबंडे,शिवाजीराव पाटील,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,जीवनराव गायकवाड,भगवानराव ससाणे,धम्मानंद कांबळे,कैलास भालेराव, गणेश मदने,अजय भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
