पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी – पाशाभाई पटेल

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी - पाशाभाई पटेल

अहमदपूर (गोविंद काळे) : तापमान वाढ हा जागतीक स्तरावरील एक गंभीर विषय बनला असून सबंध मानवजातीवर एक गंभीर संकट म्हणून हा प्रश्न जगापुढे आला आहे.यावर पर्याय म्हणून आजच सजग होवून पर्यावरण संतूलनासाठी बांबू लागवड करावी असे अवाहन शेतकरी नेते तथा कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केले. येथील तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्ना संबंधाने आयोजित धरणे निदर्शने अंदोलन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी माजी मंत्री विनायकराव पाटील हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार बब्रूवान खंदाडे, अनूसूचीत जाती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव भालेराव,प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाक्के, किसानमोर्चा चे सरचिटणीस दिलीपराव देशमुख,जि.प.सदस्य अशोकराव केंद्रे, अशोकराव चिंते,आर.डी.शेळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले की,जगातील 198 देशांच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येवून एक अहवाल सादर केला आहे.जागतीक तपमान वाढीमुळे जगाच्या समुद्रकिनाऱ्यावरील मोठमोठी शहरे ही पाण्याखाली जाणार आहेत.डिझेल पेट्रोल च्या अतीवापरामूळे कार्बनचे प्रमाण वाढत आहे.पृथ्वीच्या पोटात असलेले सूप्त स्वरूपात असलेले कार्बन मानवी गरजेपोटी सातत्याने उपसा केले जात आहे.अडीचहजार वर्षापूर्वी हवेतील कार्बन 280पीपीएम होता आत्ता 422 पीपीएम आहे.ज्या दिवशी हे प्रमाण 422 होईल त्या दिवशी पृथ्वीचा विनाश अटळ आहे.मोदी सरकारने 2017 साली बांबू हे झाड नसून गवत आहे असे जाहीर केले असून बांबूचे फायदे हळू हळू समाजापूढे येत आहेत.बांबू पासून इथेनाॅलची निर्मिती होत आहे.ऊसा पे॓क्षा बांबू पासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निघते त्यामुळे भविष्यात ऊस शेतीपेक्षा बांबू शेतीकडे शेतकर्‍यांनी वळावे.यात शेतकऱ्यांचे,पर्यावरणाचे पर्यायाने देशाचे हित जोपासले जाणार आहे.या साठी मोदी सरकारने बांबू लागवडी संदर्भात मोठ्या प्रमाणात अनूदान, योजना चालू केल्या आहेत याचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.तसेच सध्या साखर कारखान्याच्या दूर्लक्षामूळे शेतकर्‍यांचा ऊस गाळपाअभावी उभा आहे.या उभ्या शिल्लक ऊसाला सरकारने पैसे द्यावे.भविष्यात बांबू शेतीच शेतकर्‍यांना तारू शकते आणि बांबू शेतीच देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचे काम करेल असा विश्वास त्यांनी बोलुन दाखविला. या प्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवून शेतकर्यांना मार्गदर्शक केले.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा उपस्थित होता.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!