छत्रपती शिवरायांनी स्वत:चे नव्हे तर रयतेचे राज्य निर्माण केले..!

छत्रपती शिवरायांनी स्वत:चे नव्हे तर रयतेचे राज्य निर्माण केले..!

ह.भ.प.वनिताताई पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवरायांनी स्वत:साठी नव्हे तर रयतेसाठीच रयतेचे राज्य निर्माण केले असे प्रतिपादन शिरुर ताजबंद ह.भ.प.वनिताताई पाटील यांनी आपल्या कीर्तनात सांगीतले. तालूक्यातील शिरूरताजबंद येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलताना पाटील ताई म्हणाल्या की, शिवरायांनी आयुष्यात अनेक लढाया केल्या त्या कांही कोण्या जाती धर्मा विरोधात नव्हत्या तर जनतेला त्रासातून बेबंदशाहीतून मुक्त करण्यासाठी लढाया केल्या .छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात लढाईसाठी किंवा शुभ कार्यासाठी केंहाही मुहुर्त पाहीला नाही.स्वराज्य निमिर्तीसाठी अनेक जाती धर्मातील विश्वासू मावळ्यांना एकत्रीत करुन स्वराज्याची संकल्पना पटवुन दिली. त्याच प्रमाणे शिरर ताजबंद येथे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद भोसले यांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्रीत करुन यशस्वीरित्या शिवजयंती उत्साहात साजरी केली. अनेक किल्यांची निर्मिती केली परंतू एकाही किल्याला स्वत:चे किंवा कुटुंबियांचै नाव दिले नाही यातून शिवरायांची उदारता दिसून येते. ह.भ.प.वनिताताई पाटील शिवजयंती कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सर्वजण एकत्र येऊन व ग्रामस्थांनी प्रयत्नातून साजरी करण्यात आली. ह.भ.प.सौ.वनिताताई पाटील. यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन भोसले परिवार यांच्याकडून करण्यात आले होते; यावेळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लातूर जिल्ह्याचे खा.सुधाकर श्रंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, सरपंच बालाजी सारोळे, चेअरमन तुळशीराम भोसले, प्रशांत पाटील, निळकंठ पाटील,रामभाऊ बेलाळे, ॲड संतोष माने,गोविंद गिरी उत्तमराव पाटील, बालाजी जवळगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवानंद भोसले, महेश बिल्लापट्टे, गणेश कापसे, रणधीर पाटील, प्रताप पाटील, जयवंत सगर, दिलीप पाटील, अल्लाउद्दीन किनिवले मारोती मोरे, गजेंद्र वलसे, संजय वाघमारे, ज्ञानोबा मंतलवाड,बबन मलफेतवार, मच्छिंद्र कांडनगिरे, हणमंत बडगिरे, मुन्ना शेख, मोहन वलसे, एन.टी.बिराजदार, सत्यवान भोसले,अंतेश्वर वलसे,गोविंद गिरी, रवी स्वामी, दत्ता कोंडलवाडे, विठ्ठल सारोळे, विरभद्र भुरे, बालाजी वाघमारे, रमेश कौरवार, रवी दावणगावे, दिलीप मोरे, मोहन पाटील, नागनाथ बलशेटवार, भोसले उद्धव, रामकिसन पडोळे, डोंगरे दादा, नागेश शिंदे, नामदेव श्रीमंगले, शादुल शेख, राजे अंबादास, सोयल शेख, गंगाराम शिंदे, यशवंत कांबळे, लक्ष्मण गवळी, नवनाथ वाघमारे, विक्रम भोसले ; यांच्यासह आदि मान्यवर व शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!