राष्ट्रवादी काँग्रेसचा; काँग्रेसला दणका ! अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचा; काँग्रेसला दणका ! अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीरी नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरातील काँग्रेससह इतरही अनेक पक्षाच्या आजी- माजी नगरसेवकासह युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा माजी तालुकाध्यक्ष प्रा. रामकिशनजी सोनकांबळे, मादलापुर चे सरपंच उदयसिंह मुंडकर, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, भीमशक्तीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवकुमार कांबळे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवानंद तोडकर, बबलू शेल्हाळकर, अमोल बसवराज बिरादार, भीमशक्ती चे तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे, ओबीसीचे शहराध्यक्ष अनिल कुसळे, भीमशक्ती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रदीप तावरे, भीमशक्तीचे युवा शहराध्यक्ष संघर्ष कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा पवार, अलीम शेख, अमित कांबळे, शिवा देशमुख, लोणी ग्रामपंचायतीचे सदस्य शेख एकबाल, उदगीर शिवसेना उपाध्यक्ष अमोल भवाळ, भीमशक्तीचे देवनी तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे, विकास गायकवाड, दीपक भोसले, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे.

यापूर्वीच काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेल विभागाचे तालुकाध्यक्ष सय्यद जानी मिंयाॅ मो. हनीफ तसेच काँग्रेस सेवादलाचे जिल्हा सचिव पाशा मिर्झा बेग, एम आय एम चे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, जर्गर शमसुद्दिन, शेख फैय्याज, शेख नूरजहाँ बेगम, हाश्मी रेश्मा, यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले जळकोटचे नगरसेवक तात्या पाटील, संदीप डांगे, गोविंद भ्रमण्णा यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे.
काँग्रेस पक्षातील इतरही काही मान्यवर पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची मोठी गोची होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय गणिते मांडली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या या इन्कमिंग मुळे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी मिळेल? हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्याने आलेल्या लोकांना संधी दिली जाईल की? निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल? यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या वतीने समविचारी इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी चालू असल्याची चर्चा आहे. यामध्ये प्राधान्याने राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावेळेस नगरसेवका मधून नगराध्यक्ष निवडला

जाणार असल्याने नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर होणारा घोडेबाजार विचारात घेऊन अनेकांनी आपापल्या प्रभागात प्रचाराला सुरुवात केली असून काहीजणांनी तर सर्वच पक्षांशी संधान बांधून ठेवले आहे. काही जणांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे. एकंदरीत नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अद्याप बिगुल वाजले नसले तरी कार्यकर्त्यांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होईल की नाही? यासंदर्भात अद्याप कोणत्याही पक्षाकडून स्पष्ट सूतोवाच्य झालेले नाही.
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने देखील या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्ष पदाची धुरा ऐनवेळी मनोज पुदाले यांच्यावर सोपवली आहे. असे असले तरीही भारतीय जनता पक्षाने उदयसिंह ठाकूर यांना बाजूला केल्यामुळे गटबाजी बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आपल्यालाही निवडणुकीमध्ये संधी मिळेल. असा विचार करून शिवसेनेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, मात्र जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असतील तर शिवसेनेचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत येणारा काळ उदगीरच्या नगरपरिषदेचे भवितव्य ठरवणार असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासाठीही या निवडणुका एक मोठे आव्हान ठरणार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!