मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) : बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन आणि मासिक जीवन गौरव तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार लातूरचे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार तथा विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना देण्यात आला.
सामाजिक,साहित्यिक, क्रीडा, संस्कृती व शैक्षणिक क्षेत्राला वाहिलेले मासिक जीवन गौरव हे औरंगाबाद आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना प्रत्येक वर्षी पुरस्कार देतात. सोळाव्या लोकसभेत अत्यंत चांगली कामगिरी केलेले लातूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार यांनी अनेक लोक उपयोगी कामे केलेली आहेत. प्रामुख्याने गायरान जमिनीवर राहत असलेल्या अनेक गरीब लोकांना त्यांचे घरकुल नियमित करून देणे,एक लाखापेक्षा जास्त लोकांना उज्वला गॅस या योजनेचा फायदा करून दिला. लातूर लोकसभा मतदारसंघात हजारो वृद्ध कलावंतांना केंद्र सरकारचे पेन्शन सुरू करून दिले. मतदार संघातील कॅन्सर आणि हृदयविकार चे रुग्ण यांना प्रधानमंत्री सहायता निधीतून करोडो रुपये ची मदत मिळवून दिली.आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला कमी तिकीट दरात विशेष ट्रेन सुरू केली. लातूरला पासपोर्ट कार्यालय, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, पोस्टाचे विभागीय कार्यालय अनेक राष्ट्रीय महामार्ग ,अनेक नवीन रेल्वे गाड्या,रेल्वे बोगी कारखाना, रेल्वेनी लातूरकरांना पाणी आणले,लातूर टेंभुर्णी हायवेला नॅशनल हवे मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केला. लोकसभेमध्ये प्रश्न मांडला. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेषता लातूर आणि नांदेड या ठिकाणी नीट परीक्षा सेंटर सुरू केले.असे अनेक समाज उपयोगी काम मतदारसंघात करून संसदेमध्ये अनेक विधेयकावर आपले मत मांडले. भारतीय संसदेत शंभर टक्के उपस्थिती संसदेच्या कामकाजामध्ये नोंदवली.केंद्र सरकार च्या राजभाषा स्थाई समितीवर कार्यकारी संयोजक म्हणून काम करताना संपूर्ण भारतात हिंदीत कामकाज झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला. दक्षिण भारत आणि नॉर्थ ईस्ट इंडिया या भागामध्ये हिंदी चे कामकाज वाढण्यासाठी प्रयत्न केले.अशा अनेक कार्याची दखल घेऊन बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन आणि मासिक जीवनगौरव यांच्यावतीने आज औरंगाबाद येथे मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन लोकप्रिय माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विश्व दलित परिषदेचे महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष एडवोकेट सिरिन वारे,भाई पंकज खरात ,भाई अरुण गडवे,भाई विशाल इंगळे, रणनितीकार एडवोकेट अविनाश जी आवटे,एडवोकेट गौतम त्रिभुवन, विश्व दलित परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख सागर वाघमारे,विश्व दलित परिषद महाराष्ट्र शाखा तृतीयपंथी आघाडीचे प्रमुख अल्ताफ शेख. आणि बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे संस्थापक, प्रख्यात साहित्यिक रामदास वाघमारे आदी उपस्थित होते. डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!