माती,माता आणि मातृभूमी मुळे व्यक्तित्व घडते – डॉ. राजकुमार यल्लावाड

माती,माता आणि मातृभूमी मुळे व्यक्तित्व घडते - डॉ. राजकुमार यल्लावाड

अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी मराठी संवर्धन पंधरवाडा संपन्न.

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे .व्यक्ती फक्त आपल्या मातृभाषेतूनच अभिव्यक्त होत असतो.मातृभाषा ज्याला नीटनेटकी येते, तो इतर भाषेचाही अभ्यासक होऊ शकतो. कारण व्यक्तीच्या व्यक्तित्वाची जडणघडण ही मातृभाषेतूनच होते जो व्यक्ती माती, माता आणि मातृभाषेला विसरत नाही तो जीवनात यशस्वी होतो. असे प्रतिपादन मराठी भाषा व साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा .डॉ . राजकुमार यल्लावाड यांनी केले.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांनी करण्यात आले होते.

या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .डी. डी. चौधरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड हे उपस्थित होते . आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून ते पुढे बोलताना म्हणाले की ,संता महंतांनी व साहित्यकार यांनी मराठीत चिरंजीवी अक्षय साहित्य निर्माण केले आहे. पाश्चात्य विचारकांनी ही मराठीची महती मान्य केली आहे .जोपर्यंत कष्टकरी, शेतकरी मराठी भाषेचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करीत राहील, तोपर्यंत मराठी भाषा नेस्तनाबूत होऊ शकत नाही. आज पर्यंत विविध भाषांचे, परकीय सत्तेचे व त्यांच्या संस्कृतीचे आक्रमण मराठीवर झाले तरीही मराठी भाषेचा व साहित्याचा इतिहास वैभवशालीच राहिला आहे. आजच्या महाजाल अर्थात इंटरनेटच्या युगात मराठी मोठ्या दिमाखाने जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून वावरत आहे .परंतु आजच्या संगणकाच्या संक्रमण काळात मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करण्याची व तिला वैभवाच्या शिखरावर पोहोचविण्याची जबाबदारी युवकांची आहे . असेही ते म्हणाले .
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपा प्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांनी म्हटले की , अभिजात साहित्याचे दालन मराठी आहे. संत, महंत , साहित्यकार व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. या सर्वांचे मराठी भाषेच्या संवर्धनात महत्त्वाचे योगदान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. माराती कसाब यांनी केले तर आभार ह.भ.प. प्रा. डॉ.अनिल मुंडे यांनी मानले. या कार्यक्रमास तांत्रिक साह्य संगणकतज्ज्ञ ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले.आभासी तथा दूर दृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सरकटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!