देशाच्या अरोग्यासाठी शेतकरी बांधवांनो विषमुक्त शेती करा – कृषिरत्न आबासाहेब मोरे

देशाच्या अरोग्यासाठी शेतकरी बांधवांनो विषमुक्त शेती करा - कृषिरत्न आबासाहेब मोरे

चाकुर (गोविंद काळे) : रासायनिक खताचा, कीटकनाशकाचा, तणनाशकाचा वापर करून जमीन ही नापिकी झाली आहे. आपल्या भूमातेला काळ्‍या आईला रोगापासून वाचविण्यासाठी व देशाचे आरोग्य घडविण्यासाठी शेतकरी बांधवांनो विषमुक्त शेती करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक मार्ग दिंडोरी प्रणित कृषी शास्त्र विभागाचे प्रमुख कृषिरत्न गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी केले.
चाकुर येथील सावली फाऊंडेशन चारलिंब,येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ-त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरी प्रणित) अंतर्गत कृषी शास्त्र विभाग आयोजित,जागतिक कृषी महोत्सव २०२१ चे चाकुर येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक म्हणून आबासाहेब मोरे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकुरकर,आदर्श ग्रामपंचायत अलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे, नगराध्यक्ष सिध्देश्वर पवार, चाकुरचे उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,नगरसेवक अ‍ॅड संतोष माने आदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आबासाहेब मोरे म्हणाले की निसर्गाची जाणिव ठेवुन विज्ञानाची सांगड घालत शेती करणे काळाची गरज आहे,वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगती साधता नविन तंत्रज्ञानाचा वापर करत पारंपारिक गावरान बि-बियाने वापरुन पोषणयुकत व विषमुक्त अन्न पिकवावे व ते खाण्यावर भर द्यावा सेंद्रिय शेतीकडे वळावे.उत्तम शेती,मध्यम व्यापार,कनिष्ठ नोकरी ही बिरुदावली परत आणण्यासाठी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी विषमुक्त शेती करावी.
बांधावर झाडे आणि गोठ्यात गाय असल्या शिवाय शेतकरी प्रगती करू शकणार नाही.गावरान बियाणे वापरा सेंद्रिय व नैसर्गिक शेती करा.घरात विषमुक्त अन्न खाल्ले तरच आपण वाचू शकतो गावात येणारा भाजीपाला व अन्न विषमुक्त असेल तरच आपण अनेक रोगांवर प्रतिकार करू शकतो.निरोगी माणूसच देशाचे भविष्य घडवू शकतो.शुद्ध हवा,शुद्ध पाणी आणि स्वच्छता याची आता नितांत गरज भासत आहे. गावातच आपल्याला सर्व निर्माण करता येते आपल्या गावाला स्वावलंबी बनवता येतं व गावातच स्वयंरोजगाराची निर्मिती करता येते गावाला तीर्थक्षेत्र करा इतर कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जाण्याची किंवा कोणी बुवा बाबा गंडेदोरे करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.
भविष्यकाळात पुढच्या पिढीला वाचविण्यासाठी अनेक रोगापासून दूर ठेवण्यासाठी विषमुक्त शेती हाच एकमेव पर्याय आहे.आज माणूस माणसापासून दूर जात आहे कुटुंबासाठी भाकरी कामावने खूप मोठी गोष्ट नाही पण ती कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे.
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पंचमहाभूता समोर आजही विज्ञानाचे काही चालत नाही स्वतःच्या समाधानासाठी संस्कार अत्यंत आवश्यक आहेत ज्ञान,दान,शास्त्र याचे महत्त्व येणाऱ्या पिढीला समजून सांगणे गरजेचे आहे संस्कृती साहित्य आणि प्रदर्शन आपल्या आयुष्यामध्ये अत्यावश्यक असल्याचे कृषिरत्न आबासाहेब मोरे यांनी सांगितले.
यावेळी समस्त,ग्रामस्थ, शेतकरी बांधवांना कृषी, विवाह,ग्रामदैवत,सेंद्रिय देवता,बालसंस्कार, देव-देव्हारा मराठी अस्मिता, जनकल्याण आदि विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ,शेतकरी वर्गाकडून खुप उत्स्फुर्त पणे प्रतिसाद दिला.महिला वर्गासाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी तर आभार गजानन करेवाड यांनी मानले.
जागतिक कृषी महोत्सव संपन्न करण्यासाठी चाकूरचे सेवेकरी बालाजी मद्रेवार,बालाजी करेवाड, भगवान करेवाड, वनमाला निला, अंबादास करेवाड, ज्ञानेश्वर कासार,गणेश पैंजणे संतोष माडगे, दैवशाला करेवाड,वंदना सुर्यवंशी, सारीका गोचडे, आदि चाकुर केंद्रातील महिला व पुरुष सेवेकरी यांनी सहकार्य केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!