प्रेमसंबंधातून इंजिनिअरची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा

प्रेमसंबंधातून इंजिनिअरची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा

पिंपरी (रफिक शेख) : लग्नानंतर इंजिनिअर असलेल्या तरुणाला महाविद्यालयातील प्रेयसी अचानक भेटली. त्यानंतर त्यांच्यातील जुने प्रेम पुन्हा बहरले. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र, त्यानंतर प्रेयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या ३५ वर्षीय इंजिनिअर तरुणाच्या ६४ वर्षीय वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे शिक्षण घेताना महाविद्यालयात एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. शिक्षणानंतर मात्र तरुण आणि त्याची प्रेयसी यांची ताटातूट झाली. दरम्यान, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणाला नोकरी लागली. त्याचे लग्न झाले. त्याला अपत्य प्राप्तीही झाली. सारे काही सुरळीत असताना त्याची आणि महाविद्यालयीन प्रेयसी तरुणाला असलेल्या तरुणीची अचानक भेट झाली. त्याच्या प्रेयसीचेही लग्न झाले होते. तसेच ती प्रेयसी एका बाळाची आईदेखील झाली असल्याचे तरुणाला समजले. मात्र, तरीही जुन्या प्रेमाने उचल खालली.

तरुण इंजिनिअर आणि त्याची प्रेयसी यांच्यातील ‘प्रेम’ पुन्हा बहरले. मात्र, दोघांचेही लग्न झाल्याने त्यांना त्याचा अडसर वाटत होता. दोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी तरुणाने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या प्रेयसीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे ठरले. त्यानुसार तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र, त्याच्या प्रेयसीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणाचा भ्रमनिरास झाला. प्रेयसी प्रतिसाद देत नसून त्रास देत आहे, आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही, असे एका चिठ्ठीत लिहून तरुणाने १३ डिसेंबर २०२१ रोजी हिंजवडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी पोलिसांत नुकतीच तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ४ एप्रिलला गुन्हा दाखल केला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!