योग साधना काळाची गरज – कलावती भातांब्रे

योग साधना काळाची गरज - कलावती भातांब्रे

अहमदपूर (गोविंद काळे) : २१ वे शतक हे स्पर्धेचे, ताणतणावाचे, पालकांच्या अपेक्षेचे, फास्टफुडचे आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगासने , प्राणायाम, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार नियमित केले पाहिजेत असे प्रतिपादन योग शिक्षिका जिल्हा संवाद प्रभारी कलावती भातांब्रे यांनी केले. संत ज्ञानेश्वर विद्यालयात दि.4/4/2022 पासून चार दिवसीय योगा प्राणायाम शिबिर महिला पतंजली योग समितीच्या वतीने घेण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ योग मार्गदर्शक शिवमुर्ती भातांब्रे, योग शिक्षिका जिल्हा संवाद प्रभारी कलावती भातांब्रे, तालुका प्रभारी पुष्पा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनकडून योगा प्राणायाम चे प्रात्यक्षिक करून घेतले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक शिवमुर्ती भातांब्रे यांनी विद्यार्थ्यांना जनरल प्रश्न विचारून त्यांचे कौतुक केले व त्यांना बक्षीस म्हणून चिंतन कॅलेंडर देऊन त्यांचा सत्कार, गौरव केला .यावेळी मार्गदर्शक शिवमुर्ती भातांब्रे सर, योग शिक्षिका कलावती भातांब्रे, पुष्पा ठाकूर यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. भातांब्रे सरांनी सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम प्रकार ,प्राणायाम इत्यादी बाबत सखोल असे मार्गदर्शन केले. व दुसरं सर्वकाही विसरा पण आई वडिलांना विसरु नका अशी शपथ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली. कलावती भातांब्रे पुढे बोलताना म्हणाल्या की, ही शाळा प्रेम, ज्ञान व शक्ती यावर अधिक भर देणारी शाळा आहे. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, शक्ती म्हणजे शरीराचा आरोग्याचा विकास. या शिबिरात पुढे पुष्पा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांकडून सुपर ब्रेन योगा करून घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने योगा प्राणायाम करत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी राज्य आदर्श शिक्षिका तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे सह शिक्षक वृंद उपस्थित होते. सदरील शिबिराचे सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार संगीता आबंदे यांनी मानले. शेवटी पसायदान घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली. शिबीर यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!