तीस लक्ष रुपयांचा रस्ता न बनवता एमबी, व सिसी तयार

तीस लक्ष रुपयांचा रस्ता न बनवता एमबी, व सिसी तयार

जि.प.बांधकाम विभागातील प्रभारी उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांचा प्रताप

महागाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येणारा रस्ता न बनवताच एम बी व सिसी बनवुन तीस लाख रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या सतर्कतेने हाणून पाडला आहे. रस्ते विकासाचे मुख्य साधन असुन खेड्यापाड्यातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेशी जोडण्यात येवुन त्यांच्या विकासाचा राजमार्ग सोपा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहेत परंतु काही भ्रष्ट अधिकारी या निधीवर डोळा ठेवुन शासनाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासत असल्याचा प्रकार महागाव तालुक्यात घडला आहे हिवरा(संगम) जिल्हा परिषद गटातील टेंभी ते हिवरा रस्त्यावरून कवठा गावाकडे जाणाऱ्या जिल्हापरिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे अंदाजे एक किलोमीटर डांबरीकरणाचे काम ३०-५४योजनेमधुन मंजुर करण्यात आले या कामाकरिता ३०लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला याच निधीवर डोळा ठेवुन महागाव येथील जि.प.बांधकामाचे तत्कालीन प्रभारी उपअभियंता एम.एच कुमठे यांनी कनिष्ठ महिला अभियंता व कंत्राटदाराला हाताशी धरून सदर काम न करताच या कामाची एम बी(मोजमाप पुस्तिका) व सिसी(काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बनवुन बिले काढण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ येथे पाठविले परन्तु तेथील यावले नामक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी सदर न झालेल्या कामाचे बिले काढण्यास नकार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला असुन प्रभारी अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या कार्यकाळात झालेल्या तालुक्यातील अनेक विकासकामांबाबत साशंकता निर्माण होत आहे.त्यामुळे शासन सेवेत राहून शासनाची फसवणुक करणाऱ्या कुमठे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व त्याला साथ देणाऱ्या कनिष्ठ महिला अभियंता व कंत्राटदारावर कारवाई केल्या जाणार की त्यांची पाठराखण करून त्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घातल्या जाईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चौकट
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने ३०-५४या लेखशीर्षा खाली कवठा ते हिवरदरी असा अंदाजे दोन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ३०लक्ष रुपये मंजुर करण्यात आले परंतु काम पुर्ण न करताच मार्च महिन्यात एम बी व सिसि बनविण्यात आली असताना त्या ठिकाणी आता काही साहित्य येवुन पडले त्यामुळे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून शासनाची लुट करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा या गैरव्यवहाराविरोधात विधिमंडळात आवाज उठविल्या जाईल – आ.नामदेवराव ससाणे.

चौकट

काम पुर्ण न होताच एमबी व सिसी कशी काय बनविली जावु शकते?यावरून प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे अशा भ्रष्ट कारभाराला पाठबळ असुन त्यांच्याच जोरावर उपअभियंता व कनिष्ठ अभियंता बोगस कामे करून शासनाची फसवणुक करीत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील सर्व विकास कामांची चौकशी होणे आवश्यक असुन तत्कालीन उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे – विलास भुसारे(माजी जि.प.सदस्य यवतमाळ)

चौकट

कामे न करताच एमबी व सिसी बनविण्याचा प्रकार गंभीर असुन या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाईल – दिलीप कुठे (कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ)

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!