९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर: सरपंचपदी दिसणार नवीन चेहरे

९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर: सरपंचपदी दिसणार नवीन चेहरे

अहमदपूर तालुक्यात ४८ ग्राम पंचायतवर महिलाराज

अनेकांना धक्का तर काहींना लॉटरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी २९ जानेवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे काढण्यात आली.तालुक्यातील ९७ सरपंचपदाचे आरक्षण २९ जानेवारी जाहीर झाले. संसाराचा गाडा चालविणाऱ्या महिलावर्गा साठी ५० टक्के आरक्षणानुसार सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीतही बोलबाला दिसून आला. अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने सत्तेच्या चाव्या आता गृहलक्ष्मीच्या हाती येणार हे निश्चित झाले आहे. तालुक्यातील ९७ ग्रा.पं.पैकी ४९ ग्रा.पं.मध्ये येत्या ५ वर्षात महिला सरपंच विराजमान होणार आहेत. दरम्यान शुक्रवारी २०२० ते २०२५ या ५ वर्षांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.च्या सरपंच आरक्षणाची सोडत उपविभागिय अधिकारी प्रभोदय मुळे, आणि तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात २७ महिला व २२ पुरुषांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे.यानंतर पुढच्या टप्प्यात होणाऱ्या उर्वरित ४९ ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीतून तालुक्यातील एकूण ४८ महिला सरपंचांना संधी मिळणार आहे.त्यात ०९ ग्रामपंचायतींवर एस्सी महिला सरपंच विराजमान होणार आहेत तर दोन गावांत अनुसूचित जमातीच्या सरपंचांना ०२ महिला सरपंचाना संधी मिळणार आहे.ना.मा.प्र. महिला १३, सर्वसाधारण महिला २४, अनु. जाती १०, ना.मा प्र.१३, सर्वसाधारण २५,अनु.जमाती०१ असे ९७ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत झाली आहे. त्यातील ४९ ग्रामपंचायतीमध्ये अनु. जाती०४ महिला, अनु.जमाती ०१ महिला, ना.मा. प्र.०७ महिला, सर्वसाधारण मध्ये १५ महिला सरपंच तर अनुसूचित जाती ०३, ना.मा. प्र.१०, सर्वसाधारण मधून ०९ जण सरपंच पदावर विराजमान होणार आहेत. या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात सर्वांच्या समोर लहान मुलांकडून चिठ्ठी काढण्यात आले आरक्षण चिट्ठी काढून जाहीर होताच कार्यकर्ते जल्लोष करीत होते.

अनेकांचे मनसुबे धुळीस

९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर: सरपंचपदी दिसणार नवीन चेहरे

तालुक्यातील ग्रा.पं. निहाय आरक्षण मध्ये अनेक इच्छुकांना धक्का बसला असल्याने येणाऱ्या ५ वर्षातील निवडणुकीत नवीन चेहरे सरपंचपदी विराजमान होण्याची चर्चा या आरक्षणा नंतर राजकीय पटलावर रंगू लागली आहे.आरक्षण सोडत वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटल्याची चर्चा या दरम्यान सुरू होती. मात्र आरक्षण बदलल्याने इतर चाचपणी सुरूवात झाली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!