रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान चे रक्तदान शिबीर संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने एकाच दिवशी महाराष्ट्रातील जवळपास 13 जिल्ह्यात रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नेटिझन्स फाऊंडेशन अकॅडमी लातूर, पद्मशाली संघटना, प्रहार जनशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नेटिझन्स फाऊंडेशन अकॅडमी चे सुधाकर तोडकरतोडकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी श्रीनिवास नक्का, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा पाटील, महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक ज्ञानेश्वर काळे, लातूर जिल्हा संघटक प्रवीण रब्बेवार, लातूर जिल्हा समन्वयक जयंत आघाव उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मण आतकरे, गजानन गायकवाड, खंडू पवार, रायबा लोभे, श्रीकांत देशमुख, श्रीराम शिंदे, छत्रगुण काळे, प्रा.गजानन मोहिते, सुशील काळे, रवी काळे, हणमंतदादा काळे, राहुल मोहिते-पाटील, महेश दंडिमे, गोपाळ वाघमोडे, तानाजी देशमुख, सागर काळे, वसीम, सुनील काळे, भास्कर कांबळे, शिवाजी काळे, रणजित माळी, विकास माळी, ऋषी काळे, शिवशंकर नागपुरे, लक्ष्मण इंगळे, रोहित काळे, अभिषेक सोनवणे, नीलकंठ गिरी, रंगनाथ माने आदी कार्यकर्ते, पदाधिकार्याचे सहकार्य केले.