अंगणवाडीच्या बांधकामात कचचा वापर

अंगणवाडीच्या बांधकामात कचचा वापर

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

लातूर (प्रतिनिधी) : चाकूर तालुक्यातील रामवाडी रोहिना येथील अंगणवाडी बांधकामात वाळु ऐवजी कचचा वापर करुन बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. अंगणवाडी इमारतीच्या बांधकामात कचचा वापर झाल्यामुळे पाया मजबूत राहणार नाही. परिणामी इमारत कोसळल्यास अनेकांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे दोन तीन महिन्यापासून सुरू असलेले बांधकाम थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी उपअभियंता निकम यांना सांगितले होते. त्यावरून निकम यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्यास सांगितले होते परंतु ते काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. होत असलेले काम योग्य असल्याचे उपअभियंता निकम सांगत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे सदरील कामात सिमेंट, सळई, वाळू योग्य प्रमाणात वापरलेली नाही एक तर हे सर्व साहित्य वापरून दर्जेदार बांधकाम करावे अन्यथा काम थांबवावे व दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करवी अशी मागणी शिवाजी डिगोळे, बालाजी डिगोळे, हरीराम केंद्रे, राम डिगोळे रविकिरण डिगोळे, हणमंत डिगोळे, विजयकुमार केंद्रे, शशिकांत डिगोळे, संजय केंद्रे, परशुराम केंद्रे, भागवत डिगोळे, साखाराम डिगोळे, तातेराव सूर्यवंशी, मच्छिंद्र केंद्रे, सुदर्शन डिगोळे, धोंडीराम केंद्रे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!