साहेब तुम्हाला हे शोभतय का? जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवानिवृत्त कर्मचारी यांचा छळ

साहेब तुम्हाला हे शोभतय का? जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवानिवृत्त कर्मचारी यांचा छळ

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील सहकारी पतसंस्था वर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची नियुक्ती प्रशासक म्हणून करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने हे प्रशासक आपला रूबाब दाखवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रचंड छळ करत आहेत. हे चित्र समोर येत आहे. दुर्दैवाने दिलीपराव देशमुख म्हणजे शेतकरी यांचे दैवत समजले जाते. त्यांच्या बँकेतील झारीतील शुक्राचार्यांनी कर्मचाऱ्यांचा छळ करणे, दिलीपराव देशमुख साहेबांच्या प्रतिमेला ही  गोष्ट काळीमा फासणारी आहे. असे असले तरीही हा मग्रूर आणि मस्तवाल शाखाधिकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना छळत आहे. त्यांचे राजीनामे मंजूर करत नाही. त्यांच्या ठेवी परत करत नाही. यामुळे त्यांचा होणारा आर्थिक छळ कधी थांबणार? यासंदर्भात हे सर्वजण मिळून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे न्याय मागणार असल्याची तक्रार काही सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दिली आहे.

 यामध्ये प्रामुख्याने एल. एस. कांबळे, एस .एस, वाकळे,  जाधव के. बी .यांनी केली आहे. वास्तविक पाहता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सतत प्रयत्न करायचे! तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिलीपराव देशमुख देखील आपला आदर्श कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाही त्यांच्या हाताखालचे झारीतले शुक्राचार्य मात्र आर्थिक फायदा घ्यावा, आणि स्वार्थ साधावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडूनही काही मिळते का? या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. ही अत्यंत शोकांतिका आहे. उदगीर येथील पूर्वीच्या चोबारा शाखा आणि सद्यस्थितीतील मार्केट शाखेतील व्यवस्थापक सोलापूर यांनी  या प्रकरणात कुठलेही संस्थेचे काम केले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महाव्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा छळ करू नका. त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे त्यांना मोबदला द्यावा. अशा सूचना केलेल्या असताना देखील त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली आहे.

 यासंदर्भात कार्यालयीन कर्मचारी सुभाष पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्रीमाळी, श्री उगिले आणि अधिकार्‍यांशी  संपर्क साधून आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली. मात्र कोणीही या तक्रारीला दाद दिली नाही. सद्यस्थिती सुभाष पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांची आत्तापर्यंत थकित असलेले मानधन आणि पगार मिळाले तर त्यांना न्याय मिळेल. या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. अत्यंत हालाखीच्या पद्धतीने जगत असलेले सुभाष पाटील यांचा छळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍यांनी चालवल्यामुळे या कर्मचाऱ्याला आता लग्नकार्यासाठी पैसे मिळत नसल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला एकमेव जबाबदार म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्केट शाखेचे शाखा अधिकारी तथा संबंधित पतसंस्थेचे प्रशासन हेच जबाबदार आहेत.

 दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या एवढ्या मोठ्या बँकेत असा गैरप्रकार आणि मग्रुरी अपेक्षित नसल्याची तक्रारही सेवानिवृत्त कर्मचारी आणि पिळवणूक झालेले पीडित सुभाष पाटील यांनी केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!