समाजासाठी विविध रूपात सेवा बजावणाऱ्या कष्टकऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा

समाजासाठी विविध रूपात सेवा बजावणाऱ्या कष्टकऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे रक्षाबंधन हा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्रमुख अतिथी प्रभाकर बनसोडे, ज्योती हंचनाळे,तसेच पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर, लालासाहेब गुलभिले,माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख , बालाजी पडलवार,विनायक इंगळे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख अतिथी श्री प्रभाकर बनसोडे म्हणाले, ” बहीण भावाच्या अतूट बंधनाची साक्ष देणारा हा सण आहे. सणाचे महत्व व संस्कृत विषयाचे महत्त्व विशद केले.
ज्योती हंचनाळे यांनी संस्कृत अत्यंत महत्वाची भाषा असून त्याचे महत्व सांगून रक्षाबंधनाचे महत्व सांगितले.अध्यक्षीय मनोगतात अंबादास गायकवाड यांनी रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मनीषा पाटील, प्रास्ताविक मीनाक्षी कस्तुरे, स्वागत व परिचय निता मोरे व आभार संघप्रिया गायकवाड यांनी मानले. विद्यार्थ्यांनी परस्परांना राख्या बांधल्या. समाजाचे आपणहि काहीतरी देणे लागतो म्हणून सेवावस्तीत तसेच ऑटो चालक, फळ विक्रेते, गॅरेजवर काम करणाऱ्या बांधवांना राख्या बांधून त्यांच्या प्रति बंधुभाव जपत भारतीय सण उत्सवाचे महत्त्व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला.मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा पाटील, मिनाक्षी कस्तुरे, निता मोरे,विनायक इंगळे, संदीप बोधनकर, केरबा नेमट, सचिन येतोंडे यांनी प्रयत्न केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!