वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

‘वसुंधरा’ प्रतिष्ठानच्या आवाहनाला गावागावांत प्रतिसाद

औसा (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा सण राखी पौर्णीमा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून औसा तालुक्यातील तपसेचिंचोली, नागरसोगा, तसेच गाडवेवाडी येथे विद्यार्थ्यांनी तसेच लहान मुलींनी वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे बंधू असून त्यांना दिर्घायुषी लाभो व प्रदूषणाच्या दैत्यापासून आम्हा सर्वांचे रक्षण होवो अशी प्रार्थना केली. वसुंधरा प्रतिष्ठान लातूर यांच्या उपक्रमाला प्रतिसाद देत तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची जबाबदारी स्वीकारून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा तपसेचिंचोली शाळेच्या चिमुकल्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी धनश्री सेलूकर, संस्कृती शिवरे, अक्षदा गायकवाड, अमृता यादव, शिवानी मुळे, विद्या जाधव, कपिल मुळे, लक्ष्मी कोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वसुंधरा प्रतिष्ठानच्या वृक्ष रक्षाबंधन उपक्रमाला गाडवेवाडी येथील आर्या गाडवे शौर्या गाडवे या चिमुकल्या मुलींनी प्रतिसाद देत घराच्या अंगणात असलेल्या झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी दगडू गाडवे, भीमाशंकर गाडवे उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा सण महत्वाचा मानला जातो. बहिणी प्रेमाचे प्रतीक म्हणून भावांना राख्या बांधतात आणि भावांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून व वसुंधरा प्रतिष्ठान लातूर यांच्या वृक्षरक्षाबंधन या उपक्रमाला प्रतिसाद देत नागरसोगा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शालेय परिसरातील वृक्षांना राख्या बांधत वृक्ष आमचे भाऊ, त्यांना दीर्घायुष्य लाभो,प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना केली. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी काकासाहेब फडणीस, बबन सूर्यवंशी, प्रकाश जाधव, भुरे माधुरी, प्रतिभा बनसोडे, श्रीधर चौधरी, विकास मगर, इनामदार, मिलनकुमार कोव्हाळे, यादव मॅडम, उषा घोडके, निडोळे अरुण, सारगे गंगाधर, गवळे मॅडम, यशवंत सूर्यवंशी, बाळू बेडगे, गहिनीनाथ फावडे, यशवंत शिंदे , भास्कर सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!