ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य द्या – आ.संजय बनसोडे

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य द्या - आ.संजय बनसोडे

विधी मंडळाच्या पायर्‍यावरच आंदोलन सुरू !

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य द्या - आ.संजय बनसोडे

उदगीर (एल. पी. उगिले) : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजाला संकटात टाकणाऱ्या पावसाने हाहा: कार माजवला आहे. ज्या हलक्या शेतजमिनी आहेत, त्या ठिकाणी गोगलगाय सारखे उपद्रवी कीटक वाढल्याने,मोझाक सारखे विषाणु वाढल्यामुळे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीन नामशेष झाले आहे.

तर कांहीं ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जी काळी जमीन आहे, त्या जमिनीत पाणी साचून पिके पिवळी पडली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी एकाकी पडला आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने नैतिक जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे. शासनाने महसुल विभागाकडून पंचनामे करण्याचे नाट्य करू नये.सरसकट सर्व शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे,याची जान आणि भान ठेऊन संपूर्ण राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी आग्रही मागणी माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी विधानसभा अधिवेशन चालू असतांना विधीमंडळाच्या पायर्‍यावर आंदोलन करून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. शेतकरी हतबल झाला आहे,खचला आहे. आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अगोदरच कर्जाचा डोंगर त्याच्या अंगावर असल्याने, शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाने अडचणीत आला आहे. अशा प्रसंगी शासनाने त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

राजकारणासाठी राजकारण हे जरूर करा, परंतु हे करत असताना जी शासनाची अत्यावश्यक कामे आहेत, त्या कामांना प्राधान्य द्या. अशी ही मागणी याप्रसंगी आ. संजय बनसोडे यांनी लावून धरली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याला ई डी ची नोटीस झाली आहे का? अटक होणार का? वगैरे प्रश्न प्रसिद्धी माध्यमांनी विचारले असता, त्या सर्व अफवा असून ही सर्व चौकशी यापूर्वी केव्हाच झाली आहे. आणि क्लीन चिटही मिळालेली आहे. असे ही स्पष्टीकरण याप्रसंगी संजय बनसोडे यांनी केले.

इतर प्रश्नाकडे लक्ष विचलित करून प्रमुख गरज आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज बळीराजाला मदतीची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. ही मागणी आ. संजय बनसोडे यांनी सतत लावून धरली. सभागृहात गदारोळ चालू असताना देखील, आ. संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या अर्थसाह्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कायम लावून धरली होती,या प्रश्नावर आ.संजय बनसोडे आंदोलनाच्या दरम्यान खुपच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. यातून शेतकऱ्याबद्दलचा त्यांचा कळवळा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, ही भावना,ही त्यांची तळमळ स्पष्ट होते. अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!