दापका येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन अमृत महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा

दापका येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन अमृत महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा

कमालनगर (एल.पी. उगिले) : बिदर जिल्ह्यातील कमलनगर तालुका मधील दापका सर्कल येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ढोल ताशाच्या स्वरूपात गावात रॅली काढण्यात आली. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे घोषवाक्य देण्यात आले. रॅली संपल्यानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी एका रांगेत बसून विद्यार्थ्यांनी भाषणे केली, आणि गावातील ज्येष्ठ नागरिक विलास भाऊराव जाधव गुरुजींनी मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक शिक्षकांमध्ये सर्जनशीलता असते आणि सुप्त गुण असतात. त्यासाठी त्या शिक्षकांना मुख्याध्यापक व शिक्षक यांचा कर्तव्यदक्ष नातं असावं लागतं, त्यातूनच शालेय व्यवस्थापन व्यवस्थित चालतेय, त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक मुख्याध्यापकावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची जर प्रगती, आलेख, शाळेचा मुख्याध्यापक विविध गुणाने निपून असला पाहिजे. तो सतत शाळेत राहिला पाहिजे. शाळेतील भौतिक सुविधा लक्ष दिले पाहिजे. मुख्याध्यापक आपले कर्त्याव्य बाळगून प्रशासन व्यवस्था चालवावी. असा आदेश गुरूजीनी दिले.
माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश वाडीकर यांनी बोलत असताना स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव वर्ष आणि अमृत महोत्सव वर्ष याबद्दल माहिती दिली. समाजाच्या गरजा सांगितल्या. राष्ट्राचे प्रगती कशावर अवलंबून आहे ते सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सावळे, अर्चनाताई शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष गैवंस शेख प्रमुख अतिथी अंकुश वाडीकर ज्येष्ठ नागरिक, विलासराव गुरुजी, भगवानराव जाधव, गोविंद ताटपल्ले शालेय व्यवस्थापन समिती प्राथमिक, माध्यमिक गावातील नागरिक मुख्याध्यापिका कोंगे सुनंदा, माध्यमिक मुख्याध्यापक भानुदास वासरे व सहशिक्षक शिवाजी शिगरे, संजीव बिरादार, विलास शिवपुरे,चेन्नईबसवा स्वामी, अर्चनाताई राजश्री शिंदे व प्राथमिक शिक्षक मारुती बिरादार, अशोक जाधव, गुणवंत बिरादार, सुवर्णा खंदाडे, अर्चना रेड्डी, अर्चना सुशेटवार, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!