स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन तरुणांनी समाजाची उंची वाढवण्याचे कार्य करावेत – ह.भ.प. गीतांजली झेंडे

स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन तरुणांनी समाजाची उंची वाढवण्याचे कार्य करावेत - ह.भ.प. गीतांजली झेंडे

उदगीर (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस तरुण वाईट व्यसनाला लागला असून आपल्यातील वाईट दोष काढून नव तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन तरुणांनी समाजाची उंची वाढवण्याचे कार्य करावेत. असे मत मनमंदिर फेम टॉकीज कीर्तनकार सौ गीतांजलीताई झेंडे (कुलकर्णी) यांनी व्यक्त केले. त्या उदगीर येथे नाईक चौकातील नाईक चौकाचा राजा गणपती, स्वामी विवेकानंद युवक मंडळ गणेश उदगीर येथे आयोजित केलेल्या कीर्तनात त्या बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद तारुण्यांचे प्रेरणास्थान होते, त्यांच्या कार्यांचा गौरवा बरोबरच झेंडे ताईंनी अष्टविनायका पैकी बल्लाळेश्वर या गणरायांची माहिती देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून त्यांची मने जिंकली.
आता संस्काराबरोबरच भक्तीततल्लीन होणे ही काळाची गरज असून, तरुण भक्तीत रमला की तो चांगले कार्य करत असतो. तरुणांनी आता या काळात भगवंतांची भक्ती केली तर वाईट गुणांचा नाश होऊन भक्तिमार्गाचा अवलंब स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. असेही त्या म्हणाल्या.

आता यापुढे तरुणांनी ईश्वर भक्ती, देशभक्ती, मातृ-पितृ भक्तीचा अवलंब करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. आपल्या या सुश्राव्य मंगल वाणीतून त्यांनी जनतेला समतेचा, ममतेचा, संस्कृतचा, भक्तिमार्गाचा मार्ग दाखवला.
सर्वांनी आहे ते जीवन सुखी समाधानी जगण्याचा मौलिक सल्ला दिला. या कीर्तन सोहळ्याप्रसंगी संत कबीर वारकरी भजनी मंडळांनी खूप चांगली साथ दिली. या बालकांचे कौतुक करून अंजलीताईंनी शुभेच्छा दिल्या. तर स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळाच्या सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे भरभरून कौतुक करून या युवक गणेश मंडळाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व झेंडे ताई यांचा सत्कार करण्यात आला. या कीर्तन सोहळ्यास भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कीर्तन सोहळ्याचे संचलन सुभाष तगाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ह.भ.प. सुनील महाराज जवळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!