सण,उत्सवामध्ये सामाजिक ऐक्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी – प्रा.सिध्देश्वर लांडगे

सण,उत्सवामध्ये सामाजिक ऐक्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी - प्रा.सिध्देश्वर लांडगे

कमालनगर (प्रतिनिधी) : दापका येथे माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व गणपती महोत्सव निमित्ताने जाहीर व्याख्यान शासकीय माध्यमिक विद्यालय दापका चवर येथे संपन्न झाले. यावेळी व्याख्याते प्रा.शिवश्री सिद्धेश्वर लांडगे म्हणाले, अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्य साजरे करणे चांगलेच पण..आजही धर्मांधता, जातियता, अर्थिक विषमता, बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, भ्रष्टाचार यासारखी आव्हाने निर्माण झाली आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर बंधने घातली जात आहेत, म्हणून येणाऱ्या काळात राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सण, उत्सव व्यावसायिकते कडे न जाता, सुसंस्कृत संस्कृतीनी व सामाजिक ऐक्याने साजरे करणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांने व तरूणांनी जागरूक राहून राष्ट्रीय चारित्र्य अंगीकृत केले पाहिजे.विद्यार्थी व तरूण उद्याचे देशाचे भविष्य आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी जागृत राहून आवडत्या क्षेत्रात यशस्वी सर्वोच्च बनावे .असा सल्ला दिला.
यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास वासरे व प्रमुख अतिथी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी मुख्याध्यापक माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भूविकास बँकेचे संचालक विलासराव भाऊराव जाधव व शालेय समितीचे अध्यक्ष अंकुश लक्ष्मणराव वाडीकर, भगवानराव जाधव , शिवाजीराव शिगरे शिक्षक, ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच दापका गणेशजी मुंडकर, संजीव पोतले, पांडुरंग लंगोटे, दिगंबर वाडीकर आदी मान्यवर होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक मुख्याध्यापक भानुदास वासरे यांनी केले. माध्यमिक शाळेची स्थापना 1962 या इसवी सन मध्ये झालेली आहे. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत, कित्येक डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रांमध्ये हजारो कर्मचारी झालेले आहेत.
शाळेचा विद्यार्थी संख्या 180 आहे. मुलींची संख्या जास्त आहे. ग्रामीण भाग जरी असला तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे आहे, असे मुख्याध्यापकांनी प्रस्ताविकात सांगीतले. विलास गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला, ज्यांचे लिखाण सुंदर आहे. त्यांची स्पर्धा पुढल्या कार्यक्रमात घेण्यात येईल. त्या विद्यार्थ्यांचा स्टेजवर बोलावून सत्कार करण्यात येईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव बिरादार यांनी केले.
त्यावेळी सहशिक्षक वंसतपूरे, स्वामी चेन्नबसवास्वामी सहशिक्षिका सौ. अर्चना शिंदे, सौ. राजश्री शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन भानुदास वासरे यांनी केले. विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!