NEET परीक्षेत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग भरारी

NEET परीक्षेत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग भरारी

840 विद्यार्थ्यांपैकी 752 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र

दयानंद चा निखील नावंदर नीट परीक्षेत ६५२ गुण घेवून महाविद्यालयात प्रथम

लातूर (प्रतिनिधी) : शैक्षणिक गुणवत्तेची छान असलेल्या लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत उ उत्तुंग भरारी घेत यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी NEET परीक्षेत 840 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात तब्बल 752 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत महाविद्यालयातून येण्याचा मान निखिल प्रवीण कुमार नावंदर याने पटकवला असून त्याने नीट परीक्षेत 652 गुण घेऊन महाविद्यालयात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यांनी EWS प्रवरगातAIR -४४६ मिळवला आहे तर महाविद्यालयातून दुसऱ्या क्रमांकावर यश राजेंद्र बिराजदार यांनी 620 गुण घेऊन महाविद्यालयात दुसऱ्या क्रमांकावर एस संपादन केले आहे त्याने EWS प्रवर्गात AIR १६३१ मिळवलेला असून महाविद्यालयातून सागर सावंत शशिकांत याने तिसरा क्रमांक पटकावला असून त्यास 606 गुण मिळाले आहेत हा निकाल पाहता महाविद्यालयातील 40 ते 45 विद्यार्थी एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित समजला जातो या दयानंद महाविद्यालयातील घवघवीत यशामुळे लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेची पंढरी असलेल्या दयानंद शिक्षण संस्थेचा शैक्षणिक उपक्रमात कायम गुणवत्तेत दबदबा राहिलेला आहे.

दयानंद महाविद्यालयातील नीट परीक्षेत 840 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात 752 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत महाविद्यालयातून नेट परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या व सर्व नीट परीक्षेत मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, शालेय शिक्षण समितीचे तथा संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष ललित भाई शहा, उपाध्यक्ष रमेश राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन कोषाध्यक्ष संजय बोरा, डॉ. चेतन सारडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगड उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद माने, पर्यवेक्षक प्रा. उमाकांत झुंजारे, पर्यवेक्षक हेमंत वरुडकर, नीट समन्वयक प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी, प्रा. बीएम सूर्यवंशी, नितेश दूधभाते, महेंद्र कोराळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे कौतुक केले आहे व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!