वैष्णव पॅराडाईज हॉटेलमुळे लातूरच्या वैभवात भर पडणार – आ. अमित देशमुख

वैष्णव पॅराडाईज हॉटेलमुळे लातूरच्या वैभवात भर पडणार - आ. अमित देशमुख

वैष्णव पॅराडाईज हॉटेलचे भूमिपूजन

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक विष्णुदास मंगल कार्यालय परिसरातील धायगुडे कुटुंबियांच्या नियोजित वैष्णव पॅराडाईज हॉटेलचे भूमिपूजन करण्यात आले. नियोजित हॉटेल वैष्णव पॅराडाईज ही वास्तू दोन एकर जागेमध्ये साकारली जाणार आहे त्या वास्तूत फंक्शन हॉल एसी कॉन्फरन्स हॉल डायनिंग हॉल आदी सुवीधा देण्यात येणार असून त्यामुळे लातूरच्या वैभवात भर पडणार आहे.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, दिशा प्रतिष्ठनचे मार्गदर्शक अभिजीत देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस चंद्रकांत धायगुडे, लातूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस विष्णुदास धायगुडे, सूर्यकांत धायगुडे, सिद्धेश्वर धायगुडे, रमाकांत गडदे, महेश धायगुडे, एकनाथ पाटील, संतोष देशमुख, समद पटेल, इमरान सय्यद, सिकंदर पटेल, सुभाष घोडके, केशव धायगुडे, माजी नगरसेविका सपना किसवे, कैलास कांबळे, प्रवीण कांबळे, रमेश सूर्यवंशी, अकबर माडजे, पवन सोलंकर, गोरोबा लोखंडे, प्रा.विजयकुमार धायगुडे, पंडित कावळे, अहमदखा पठाण, रविशंकर जाधव, व्यंकटेश पुरी, सचिन बंडापले, विकास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, आनंद वैरागे, दगडूसाहेब पडीले, दगडूआपा मिटकरी, फैजलखान कायमखानी, विजयकुमार धुमाळ आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते धायगुडे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.

यावेळी आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूरचा नामांकीत व सुसंस्कृत असा धायगुडे परिवार आहे. या परिवाराने लातूरची सेवा केली लातूर, नगर परिषदेत ही धायगुडे परिवाराने प्रतिनिधित्व केले आहे. देशमुख व धायगुडे परिवाराचे पिढ्यानपिढ्याचे संबंध आहेत. लातूरचा चौफेर विकास होऊन प्रगती झाली असून लातूर आज ओळखू येत नाही. लातूर जिल्ह्याचा आपल्या नेतृत्वाने पारदर्शकपणे विकास केला, यामूळे आज लातूर शहरात १०० पेक्षा अधिक मंगल कार्यालय आहेत, ते सर्व चांगले चालू आहेत. या उपक्रमात आधुनिकता स्वीकारली, धायगुडे कुटुंबाने या प्रकल्पाचे लवकरात उद्घाटन करून त्यांनी हा प्रकल्प लातूरकरांच्या सेवेत रुजू करावा, असे सांगून त्यांनी धायगुडे कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले तर आभार डॉ. कुमारी साधना विजयकुमार धायगुडे यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!