वीज अपघात टाळण्याचे महावितरणचे आवाहन

वीज अपघात टाळण्याचे महावितरणचे आवाहन

लातूर (प्रतिनिधी) : सध्या पावसाळा आणि त्यात सणासुदीचे दिवस अधिक आहेत. बऱ्याच ठिकाणी केवळ चुकीच्या वीज वापरांमुळे वीज अपघात होत असल्याचे दिसून येते. अशा संदर्भाने परिमंडलात कुठेही वीज अपघात होवून त्यात कुणाची जिवित किंवा वित्तहानी होऊ नये. त्यासाठी नागरिकांनी विजेचा सुरक्षित आणि अधिकृत वापर करुन वीज अपघात टाळावेत, असे आवाहन मुख्य अभियंता  सुंदर लटपटे यांनी केले आहे.

परिसरात बरेचशे वीज अपघात हे मानवी चुकांमुळे होतात, ते टाळण्यासाठी विजेचा अनधिकृत वापर टाळावा, विदयुत तारेवर आकडे टाकणे, घराच्या छतावर किंवा अंगणात कपडे वाळत घालण्यासाठी विदयुत वाहक रोपचा वापर करणे, शेतशिवारात जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेच्या कुंपनात विजेचा प्रवाह सोडण्याचे प्रकार कटाक्षाने टाळावेत. तसेच घरात किंवा उदयोग, व्यवसायाच्या ठिकाणी विजेची संच मांडणी अधिकृत विदयुत ठेकेदाराकडूनच करुन घ्यावी. त्यासाठी आयएसआय प्रमाणीत विदयुत साहित्याचा वापर करावा. अर्थिंगची योग्य व्यवस्था करावी. जूनी विदयुत संच मांडणी बदलून घ्यावी. पावसाने भिंती ओल्या झाल्या असतील तर त्यात विदयुत प्रवाह होणार नाही, याची काळजी घ्यावी. जोड दिलेले वायर्स वापरणे टाळावे किंवा त्याचे योग्यरितीने टेपींग करण्यात यावे. नियमानुसार ग्राहकांच्या घराच्या आतील (हाऊस प्रिमायसेस) भागात होणाऱ्या दुर्घटनेची जबाबदारी कुण्याही विदयुत वितरण यंत्रणेची नसलीतरी ग्राहक सुरक्षा ही महावितरणसाठी महत्वाची आहे.

गावठाण भागात किंवा इतरत्र कुठेही विजेच्या तारा तुटल्या असतील, विदयुत खांब तुटले असतील किंवा वीज यंत्रणा नादुरुस्त झाली असेल तर आहे. त्याबाबतची माहिती नागरिकांनी संबंधित अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी किंवा सहायक अभियंता यांना कळवावी. सोबतच लातूर जिल्हयातील नागरिकांनी त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षातील ७८७५७६२०२१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, पावसाळयात वादळी वारा आणि पावसामुळे किंवा अन्य काही कारणामुळेही वीज अपघातास पुरक स्थिती निर्माण होते. वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या तारांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, धोकादायक रोहित्रांचे बॉक्स दारबंद करण्यात यावेत, गर्दीच्या ठिकाणची वीज यंत्रणा निटनेटकी करण्यात यावी, वीज अपघात स्थळे शोधून त्यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात. याबदलही मुख्य अभियंता श्री. लटपटे यांनी महावितरण अभियंते आणि कर्मचाऱ्यांना निर्देशित केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!