महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी कुणाल बागबंदे

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी कुणाल बागबंदे

उदगीर (एल. पी. उगीले) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील युवक आघाडीच्या कर्तबगार आणि संघटन कुशल तरुणांना प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी व्यूह रचना आखण्यात आली आहे.

या क्रियाशी ल कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये उदगीर येथील तरुण कार्यकर्ते कुणाल किरण बागबंदे यांचा समावेश करण्यात आला असून तसे अधिकृत पत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी प्रदीप शिधवा, माधव सिंह, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रभारी प्रतिमा मुदगल, वंदना बैन इत्यादी मान्यवरांनी स्वाक्षरी करून दिले आहे.

सदरील नियुक्ती पत्रामध्ये प्राधान्याने सचिव आणि सहसचिव यांच्या निवडी केल्या असून युवक काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये सहभागी झालेल्या या तरुणांनी आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पक्षाची ध्येयधोरणे आणि सर्वधर्मसमभावाची भावना यासोबतच एक संघपणे काँग्रेसचे नेते सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अलवारू राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी या कार्यकारिणीकडून अपेक्षा व्यक्त करून आपल्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त ताकतीने प्रत्यक्ष आपल्या कर्मभूमी मध्ये काँग्रेस पक्षाचे काम करावे आणि काँग्रेसच्या एकसंघतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा जनतेची मने आणि हृदय जिंकण्याची ही संधी काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण संघटितपणे काम करून येणाऱ्या निवडणुकात पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे कार्य करून दाखवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निवडीच्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने कुणाल बागबंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नम्रपणे सांगितले की पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश शिरसावंद मान्य करून मी कार्य करत राहील यापूर्वीही प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे पुढेही कार्य करत राहील काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव अग्रेसिव राहील माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी मी प्रयत्न करीन वरिष्ठ नेत्यांना माझ्या कोणत्याही कृतीमुळे खाली मान घालावी लागेल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही असा विश्वासी त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कुणाल बागबंदे यांच्या या निवडीबद्दल काँग्रेस पक्षातील आणि युवक आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!