पन्नास वर्षांपासून वस्ती आहे,अतिक्रमण म्हणून मतदार संघातील एकही घर पडणार नाही : आमदार संजय बनसोडे

पन्नास वर्षांपासून वस्ती आहे,अतिक्रमण म्हणून मतदार संघातील एकही घर पडणार नाही : आमदार संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघातील व मुख्य म्हणजे शहरातील अशोक नगर, फुले नगर, गांधी नगर, मुसा नगर, तोंडार पाटी व मादलापूरसह आदी भागातील नागरिकांना प्रशासनाने आपले घर अतिक्रमणात असल्याची नोटीस दिली आहे. मात्र एकाचेही घर पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावु नये. मी कायम आपल्या सोबत खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास उदगीर – जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी समाजबांधवांना दिला.
ते उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित समाज बांधवांच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, शशिकांत बनसोडे, दयानंद शिंदे, संजय काळे, पिंटु सुतार, जितेंद्र शिंदे, पप्पु गायकवाड, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्लकुमार उदगिरकर, किशाबाई कांबळे,सतिश कांबळे, आदीसह समाजबांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी,
मागील काही दिवसापूर्वीच आपल्या शहरातील काही भागांमध्ये शासकीय गायरान जमीनीवर अतिक्रमण झाल्या बाबत व ते काढण्यासाठी शासन व प्रशासनाने येथील नागरीकांना नोटीसा बजावुन त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न हे सत्तेत असणारे सरकार करत आहे. काही भागातील नागरिकांना नोटिसा बजावल्या असल्याचे मला कळल्यापासून मी विविध भागातील समाज बांधवांकडून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. त्या संदर्भातच आपल्या सोबत बैठक घेऊन चर्चा करत असून आपल्या मतदारसंघातील किंवा शहरातील कुणाचेही घर पडणार नाही, याची जबाबदारी माझी आहे.
त्यासोबतच आपले संरक्षण करण्याची शपथ मी आमदार झाल्यावर घेतली आहे. मात्र राजकीय सुडबुद्धिपोटी हा सगळा खटाटोप चालू असून यामध्ये माझ्या एकाही नागरिकांचे घर पडू नये. म्हणून मी स्वतः प्रशासनाला विनंती केली आहे. ज्या भागात नागरिक सद्या राहत आहेत, तेथे मागील स्वातंत्र्य पूर्व काळापासुन हे नागरीक या वस्तीमध्ये राहत असुन याचाही विचार शासन व प्रशासनाने करावा. असे सांगून जर शासन मुद्दाम कठोर भुमिका घेत असेल तर गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालवत असाल तर सर्वांत पहिले आपण या भागाचा आमदार म्हणून मी त्या बुलडोजर समोर उभा राहीन, अशी ग्वाही आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थित नागरिकांना व समाजबांधवांना दिला.
उदगीर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असून मी या भागाचा आमदार केवळ आपल्या एकजुटीमुळे झालो असून आपल्या प्रत्येक सुख दुःखात मी येत आहे. मात्र प्रशासनाने माझ्याच मागासवर्गीय नागरिकांच्या घरावर अतिक्रमणाच्या नावाखाली बुलडोझर लावणार असतील तर ते मी सहन करणार नाही. सर्वात अगोदर आपल्या न्याय हक्कासाठी मी स्वतः लढणार असून आपण आपल्या घरासंबंधी कुठलीही काळजी करू नये. मी आपल्या सोबत खंबीर उभा आहे, आणि सदैव राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनाही घरे पाडु नये. या संदर्भात सुचना केल्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!