ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी करावी – विवेक जाधव

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी करावी - विवेक जाधव

उदगीर (एल. पी. उगीले) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी साठी कंत्राटदाराच्या मागे फिरण्यापेक्षा किंवा मुकादमाच्या मागे फिरण्यापेक्षा ऊस तोडणी यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी करणे जास्त फायद्याचे ठरणार आहे. असे विचार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर, भाकसखेडाचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.

यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्याचे विविध फायदे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेआहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने सध्या शेती व्यवसायाला गतिमान करण्यासाठी यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सुशिक्षित मुले देखील शेती व्यवसायाकडे वळू शकतात. ऊस लागवडी पासून ते तोडणीपर्यंत सर्व कामे यंत्राने होऊ लागल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांची सुशिक्षीत मुले अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागल्यामुळे स्वतःचे ऊस तोडणी यंत्र घेऊन शेतीसाठी आवश्यक असणारा जोडधंदा म्हणूनही काम करू शकतात. आणि उत्पादन मिळवू शकतात. तसेच इतर वेळा ऊस तोडणी साठी मजुरांच्या टोळ्या शोधत फिरणे, मुकादमाच्या चकल्या मारणे अशा प्रकारामुळे कित्येक वेळेस शेतकरी आणि कारखाना दोन्हींची मोठी गोची झालेली आहे. ती होणे बंद होईल, शेतकऱ्याच्या मुलाला चार पैसे मिळू लागतील.

साधारणतः एका ऊस तोडणी यंत्राबरोबर तीस ते चाळीस युवकांना रोजगार मिळू शकतो. या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला जातो. शिवाय व्यवस्थित तोडणी झाल्यामुळे टनेजही वाढते, ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडल्यामुळे पाचट कुट्टी होऊन सेंद्रिय खताची निर्मिती होते. हा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. ऊस तोडणी यंत्र वापरल्यास ऊस पुरवठा अभावि कारखाने नोकेन होणार नाहीत. तसेच ऊस तोडणी यंत्रामुळे शेतकरी, शेतकऱ्यांची मुले आणि साखर कारखाने ही चांगलेच फायद्यात राहणार आहेत.

एकंदरीत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ऊस तोडणी यंत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे अत्यंत चांगले धोरण स्वीकारले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा युवकांचे हृदय सम्राट आ. धीरजभैय्या विलासराव देशमुख यांच्या या निर्णयांचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचेही या प्रसंगी विवेक पंडितराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बँक असून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल होत असल्यामुळे आणि सर्व संचालक मंडळ लोक कल्याणकारी योजना राबवत असल्यामुळे राज्यातील नामांकित बँक म्हणून या बँकेचा बोलबाला झालेला आहे. तरुण चेअरमन भेटल्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत अग्रेसिव असल्याचेही विवेक जाधव यांनी सांगितले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!