ग्राम पंचायत निवडणूक खर्च दाखल करण्याचे आवाहन

ग्राम पंचायत निवडणूक खर्च दाखल करण्याचे आवाहन

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालूक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 18 डिसेंबर,2022 रोजी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या संपूर्ण खर्चाचा हिशेाब 19 जानेवारी 2023 पर्यंत तहसील कार्यालयातील खर्च पथक प्रमुख (उपकोषागार अधिकारी उपकोषागार कार्यालय उदगीर, शिवाजी चौक उदगीर, जुन्‍या तहसीलच्‍या मागे) यांचेकडे विहित नमुन्‍यात जमा करणे आवश्यक आहे.

मा.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवाराने निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खर्चाचा एकूण तपशील 30 दिवसांच्या आत तालुकास्तरावरील संबंधीत प्राधिकृत खर्च पथकास विहित रितीने सादर करणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने मा. राज्य निवडणूक आयोगाने विहित “वेळ व रित” प्रमाणे खर्चाचा तपशील सादरच केला नसेल किंवा उमेदवाराचा एकूण खर्च मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा “वेळ व रित यांचे पालन झाले नसेल, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (ब) नुसार संबंधीत उमेदवारास पाच वर्षासाठी अनर्ह करण्याबाबतची तरतूद आहे. त्यामुळे डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लढविणारे व त्याचप्रमाणे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या एकूण खर्चाचा हिशोब तहसिल कार्यालय उदगीर या कार्यालयाने प्राधिकृत केलेल्या उपकोषागार अधिकारी उपकोषागार कार्यालय उदगीर येथील खर्च पथकाकडे दिनांक 19 जानेवारी 2023 पर्यत विहित रितीने सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे, असे परिपत्रक उदगीर तहसीलच्या वतीने काढण्यात आले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!