महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी मंचावर उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य सी.एम.भद्रे, विद्यार्थी प्रतिनिधी फुलराणी कांबळे, प्रा.डॉ.वैजनाथ अनमुलवाड, विद्यापीठ भाषा वाङ्मय संस्कृति अभ्यास संकुल तसेच चंद्रशेखर चवंडा, यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कल्याण मंडळाचे उद्घाटन झाले. सर्वप्रथम दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक म्हणून सहाय्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यापीठ गुणवत्ता यादीत सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी ,नीट व जे.ई.ई.परीक्षेतील सर्वाधिक गुण प्राप्त करणारे आणि विषयात महाविद्यालयात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना तिरूके म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय गुणवत्तेची खाण आहे. त्याचीच परिणती हा सोहळा आहे. कल्याण मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.जाधव म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय समृद्ध परंपरेचे असून, गुणवंतानी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा. गुणवंताचा होणारा सत्कार इतरांसाठी प्रेरणादायक असून कल्याण मंडळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि क्षमताचा वापर करण्याची संधी उपलब्ध होते. विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य जपत ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करावेत. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले, महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे येथील गुणवत्ता निर्माण झाली आहे. प्रास्ताविकात डॉ.संदीकर यांनी सांगितले की, कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.मल्लेश झुंगा स्वामी यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!