नराधमांना त्वरीत अटक करून पिडीतेला न्याय द्यावा अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल – प्रा. गोविंद शेळके

नराधमांना त्वरीत अटक करून पिडीतेला न्याय द्यावा अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल - प्रा. गोविंद शेळके

अहमदपूर येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा व सर्व परिवर्तनवादी संघटनेची पत्रकार परिषदेतील माहीती

अहमदपूर (गोविंद काळे) : कोपरा येथील प्रकरणात नराधमांना त्वरीत अटक करून पिडीतेला न्याय द्यावा अन्यथा समाज परिवर्तनवादी संघटना रस्त्यावर उतरेल अशी माहीती अहमदपूर येथील लक्ष्मीनारायण मंदीरात कोपरा प्रकरणी आयोजीत केलेल्या मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा व सर्व परिवर्तनवादी संघटनेच्या पत्रकार परिषदेत मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके यांनी दिली.

पुढे बोलताना प्रा. शेळके म्हणाले की, शिवरायांच्या व भिमरायांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दररोज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटनांचा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मला अतिशय खेद वाटतो. वैऱ्याच्याही बाई लेकीवर असा क्रुर प्रसंग येऊ नये. पिडीतेकडून मिळालेल्या माहितीनुसार जाणीवपूर्वक कट रचुन अतिक्रमणाचे कारण पुढे करून सत्तेच्या जोरावर मुजोर झालेल्या सरंपच, उपसरपंच, ग्रामसेवक व त्यांचे भाडोत्री गुंडानी एका २३ वर्षीय विद्यार्थीनीना मारहान करीत तिचा विनयभंग केल्याचे पिडीतेने सांगितले आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना असून पिडीते सोबत जी घटना घडली ही घटना पिडीतेचे आयुष्य बर्बाद करुन गेले.पिडीतेला वैद्यकीय उपचाराची गरज असून झालेल्या बदनामीमूळे पिडीते पुर्नवसन होण्याची आवश्यकता आहे. हे पुर्नवसन कोण करणार? पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच की पिडीतेला न्याय मिळवून देण्याचा असून त्या नराधमाने मोबाईल मध्ये व्हिडीओ क्लिप केलेली आहे. एका आबलेला जिवणातून उठवणाऱ्या नराधमांचा शोध घेऊन त्वरीत अटक करावी व पिडीतेला न्याय द्यावा. अन्यथा सामाजीक परिवर्तनवादी संघटनाच्या वतीने शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा टिकवून ठेवावा. जाती -जाती मध्ये तेढ निर्माण करू नये. हा लढा कोणत्या जाती विरूद्ध नसुन प्रवृत्ती विरुद्ध आहे.

या पत्रकार परिषेदेस मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक चापटे, शहराध्यक्ष प्रा.नाना कदम, उपाध्यक्ष दत्ता कदम, पिडीत मुलीचा भाऊ, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जगदीश जाधव, डि.के.जाधव, संभाजी ब्रिगेड चे विधानसभा अध्यक्ष बालाजी कदम जवळगेकर, प्रा.मारोती बुद्रूक पाटील, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे माने, यासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व नागरीक आदीची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!