वन विभागाने हत्तीबेट पर्यटनाकडे पाठ फिरवली, न्याय मागण्यासाठी २४जणांचे उपोषण

वन विभागाने हत्तीबेट पर्यटनाकडे पाठ फिरवली, न्याय मागण्यासाठी २४जणांचे उपोषण

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील देवर्जन येथील अध्यात्मिक,पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हत्तीबेट ‘ब’वर्गीय पर्यटन स्थळाकडे वन विभागाने कायमची पाठ फिरवल्याने तेथील विकास कामांना खीळ बसली आहे. शिवाय तेथील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाल्यामुळे न्याय मागण्यांसाठी हत्तीबेटावर काम करणाऱ्या २४जणांनी उस्मानाबाद येथील विभागीय वन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लातूर जिल्ह्यातील हत्तीबेट’ब’वर्गीय पर्यटन स्थळ हे वन विभागाच्या ताब्यात आहे.या ठिकाणी सुरू असलेल्या रोपवाटिकेवरील मजुरांकडून झाडांना पाणी देणे,लागवड केलेल्या झाडांची निंदणी, खुरपणी, गवत कापणे,रोपांची लागवड करून परिसराची स्वच्छता करणे, शिवाय हत्तीबेटावर दररोज पर्यटक, भाविकांना पिण्याचे पाणी व अन्य सुख सोयी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. मात्र वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी, वन परिमंडळ अधिकारी व वनरक्षक हे सहा सहा महिने हत्तीबेटाला भेट देत नसल्यामुळे तेथील कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. रोपवाटिकेचेही काम बंद असल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाली आहे.

हत्तीबेटावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी कृती आराखडा ,अंदाजपत्रके तयार करून यासाठी निधीची मागणी व प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी वन विभागाकडून पाठपुरावा करणे गरजेचे असताना या विभागाकडून ही कामे करण्यासाठी गेल्या १२वर्षांपासून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

हत्तीबेटाच्या देखभालीसाठी व पर्यटन विकासासाठी वन विभागाचे मोठे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे न्याय मागण्यांसाठी २४जणांनी उस्मानाबाद येथील विभागीय वन कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हत्तीबेटावर सुरू असलेल्या दोन्ही रोपवाटिकेची कामे करून मजुरांना तात्काळ काम उपलब्ध करून द्यावे, मागील दोन महिन्याची थकीत मजुरी त्यांना देण्यात यावी, हत्तीबेटावर सेंट्रल नर्सरी सुरू करून मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, हत्तीबेटावर दररोज वन रक्षकास येणे बंधनकारक करण्यात यावे, हत्तीबेट विकास कामांचा बृहत आराखडा ,विकास कामांची अंदाजपत्रके तात्काळ तयार करून पर्यटन व जिल्हा नियोजन विभागाकडे निधीची मागणी करण्यात यावी.हत्तीबेटावर उर्वरित शिल्लक क्षेत्रावर नवीन वृक्ष लागवड करण्यात यावी. अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी हत्तीबेट प्रकल्पाच्या विकासासाठी व्ही. एस. कुलकर्णी, सचिन सूर्यवंशी, राम बतले, श्रीधर नेलवाडे, गणेश चव्हाण, संदीपान सूर्यवंशी, विष्णू संपते, बाबू राठोड,लक्ष्मण यलमट्टे, राम बोंबीले, दशरथ बंडगर, अण्णाराव पिटले, रामदास संपते, सुनीता राठोड, रेणुका चव्हाण, सुनीता चव्हाण, सुमन चव्हाण, सुरेखा चव्हाण, क्रांती सूर्यवंशी, शेवंताबाई पल्लेवाड, जयदेवी माचोळे, महानंदा माचोळे, कविता चव्हाण उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान उपोषणकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण कर्त्यांचा तिसरा दिवस आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!