आजचा कार्यकर्ता भाजपात उद्याचा नेता होवू शकतो – प्रदेश सरचिटणीस केनेकर

आजचा कार्यकर्ता भाजपात उद्याचा नेता होवू शकतो - प्रदेश सरचिटणीस केनेकर

लातूर (एल.पी.उगीले) : भाजपाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चर्चा गावागावात बुथ स्‍तरावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणावी. ज्या कार्यकर्तेमुळे पक्ष वाढतो, तो कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. असे सागून कामातून, भूमिकेतून जनतेच्या मनात कार्यकर्ता किती रुजतो हे महत्वाचे आहे. आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता भाजप पक्षातच होवू शकतो. असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी केले.

भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक औसा येथील विजय मंगल कार्यालयात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय केनेकर बोलत होते. या बैठकीस जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख (मालक), माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रमकाका शिंदे, त्र्यंबकआबा गुट्टे, अशोक काका केंद्रे, रामचंद्र तिरुके, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जिल्हा भाजपाचे अमोल पाटील, भागवत सोट, श्रीमती रेखाताई तरडे, मीनाक्षी पाटील, कल्पनाताई डांगे, दगडू साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, सुनील उटगे, शहराध्यक्ष लहू कांबळे, गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, संध्या जैन, मुक्तेश्वर वागदरे, अमोल निडवदे यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस जिल्ह्यातील भाजपचे प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राजकीय ठराव मांडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याच्या विकासाची बसलेली घडी विस्कळीत करण्याचे काम गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे सरकारने केले. राज्यातील रोजगार व गुंतवणूक घटली. राज्याला मागे घेऊन जाण्याचे काम झाले असल्याचा आरोप केला. वॉटर ग्रीड प्रकल्पासह अनेक लोक कल्याणकारी बंद पडलेल्या योजना राज्यात नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने सुरू केल्या असल्याची माहिती देवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी भरीव निधी देणार असल्याची घोषणा करणाऱ्या या राज्‍य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला अनुमोदन देताना गणेश दादा हाके यांनी अभद्र युतीतील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत केली नसल्याची टीका करून वैधानिक विकास महामंडळ राज्य शासनाने सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.

कृषी व सहकार विषयक ठराव मांडताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने एकही शेतकरी हिताचा निर्णय घेतला नाही. उलट शेतकऱ्यांच्या दुष्टीने महत्त्वाच्या आशा अनेक योजना बंद करून शेतकर्‍यांना धोका दिला. सुडबुध्दीने विकासाच्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने लातुर जिल्ह्य़ातील गोगलगाय प्रादुर्भावसह अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक 421 कोटींची मदत केली. साखर उद्योगांना स्थिरता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री अमित शाहा यांनी निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला असे सांगितले. या ठरावास अनुमोदन देताना विनायकराव पाटील आणि खा. सुधाकर शृंगारे यांनी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कृषी विषयक धोरणाची माहिती देऊन अनुमोदन दिले.

यावेळी संजय केनेकर पुढे म्हणाले की, भाजप पक्षात कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिक असून कार्यकर्त्याच्या कामावरच देशात भाजपाने उतुंग यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रशासन आणि राज्यातील शिंदे फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती, जनजागृती खेड्यापाड्यात बुथ स्तरापर्यंत करावी असे आव्हान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केल्याबद्दल अभिनंदन करून संजय केनेकर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असताना धर्मविर नव्हते, अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांना मराठवाड्यात पाय ठेवताना दहा वेळा विचार करावा लागेल, असा बंदोबस्त भाजपाच्या युवा मोर्चाने करावा. असेही संजय केनेकर यांनी बोलून दाखविले.

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, पक्षाच्या संघटन आणि लोकप्रतिनिधी संख्या बाबतीत राज्यात लातूर जिल्हा एक नंबर असून या पुढील काळातही एक नंबर ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या ताब्यात आलेल्या सर्व ग्रामपंचायतींना वीस लाख रुपयांचा विकास निधी राज्य शासन देणार असल्याची माहिती देऊन कार्यकर्त्याला ताकद द्यावी लागेल, असे बोलून दाखविले, या बैठकीचे सुत्रसंचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले. भाजपाचे जिल्‍हा प्रभारी संतोषअप्‍पा मुक्‍ता यांनी आभार मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!