कोरोणामुक्‍तीचा संकल्प : महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन ठरले लई भारी

कोरोणामुक्‍तीचा संकल्प : महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन ठरले लई भारी

ओमानंद, कार्तिकच्या संकल्पनेतून साकारले “अ‍ॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन”

लातूर (प्रतिनिधी) : कोरोणाची रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोणा रूग्णांचा आकडा 33492 वर पोहचला आहे. तर 752 रूग्णांचा कोरोणामुळे मृत्यु झाल्याचे समोर आलेले आहे. ही बाब लक्षात घेवून अशा वातावरणातही कोरोणाशी मुकाबला करण्यासाठी जेएसपीएम संचलित महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅबचे विद्यार्थी ओमानंद स्वामी व कार्तिक बनसुडे या दोन विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “अ‍ॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन” बनविली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना कोरोणाशी मुकाबला करणे शक्य होत आहे. त्यामुळे या संशोधक विद्यार्थ्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

जेएसपीएम संचलित शहरातील मजगे नगर भागातील महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅबचे विद्यार्थी कु.ओमानंद स्वामी व कार्तीक बनसुडे या विद्यार्थ्यांनी प्राचार्य गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सुपीक संकल्पनेतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे “अ‍ॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन” बनविले आहे.

ग्रामीण पार्श्‍वभूमी आणि सेमी इंग्लिशच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत नवीन असलेले आर्टीफिशियल इटेंलिजन्स हे तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्याचा वापर करणे आणि समाजातील प्रश्‍न सोडविणे हा उपक्रम सुरू केला असून ही बाब सर्वांच्या दृष्टिने अभिमानाची आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅबचे विद्यार्थी ओमानंद स्वामी व कार्तीक बनसुडे यासारख्या अनेक विद्यार्थी कोडींग आणि इतर संकल्पना वर्षभर शिकत आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा पुरेपुरे फायदा घेवून मुले तंत्रस्नेही बनत आहेत. या माध्यमातून काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हीच मुले भारताचे उद्याचे भविष्य राहणार आहे. त्यामुळे त्यामुळे त्याच धर्तीवर प्राचार्यांच्या व अटल लॅब इन्चार्ज अरूण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “अ‍ॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन”ची निर्मिती करून कोराणा मुक्‍तीचा संकल्प विद्यार्थी ओमानंद स्वामी व कार्तीक बनसुडे यांनी केलेला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अटल लॅबचे सहाय्यक अफसर शेख, सुधीर देसाई, विपुल कुंम्भोज यांची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!