तुकारामांच्या अभंगातून जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते – ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल मुंढे महाराज

तुकारामांच्या अभंगातून जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते - ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल मुंढे महाराज

अहमदपूर (गोविंद काळे) : ‘आम्ही जातो अमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा’ या निरोपासमयीच्या निरूपणात्मक अभंगांचे अभ्यासपूर्ण विवेचन केल्यानंतर ‘संतश्रेष्ठ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून चराचरातल्या जीवधारींनी कसे जगावे? कसे जगावे? संकटातून मार्ग कसा काढावा ? आदिची शिकवण दिली असून त्यांच्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून जीवनातील सर्व प्रश्नांचे समर्पक उत्तर मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागातील ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले .

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज बीज या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, पुढे बोलतांना महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवचनकार ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे महाराज म्हणाले की, तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष केला सनातनी आणि मनू प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांचा वारंवार छळ होत राहिला. परंतु त्यांनी विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ विचारांच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य शेवटपर्यंत केले. श्री संत तुकाराम महाराज यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी मोलाचे सहकार्य केले.मुगल कालीन राजवट उलथून टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीला संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा संयोग घडून आला, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ.डी.एन.माने, डॉ. मारोती कसाब, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!