महात्मा बसवेश्वर घरा-घरात पोहचावा म्हणून ग्रंथ लिखाण – प्रा. बिरादार

महात्मा बसवेश्वर घरा-घरात पोहचावा म्हणून ग्रंथ लिखाण - प्रा. बिरादार

उदगीर (एल.पी.उगीले) : १२व्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांचे विचार घरा-घरात पोहोचावे म्हणून मी समग्र महात्मा बसवेश्वर या महाग्रंथाची निर्मिती केली असल्याचे मत लिंगायत महासंघाचे प्रांतांध्यक्ष,तथा ग्रंथाचे लेखक प्रा. सुदर्शनराव बिरादार यांनी लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने हावगीस्वमी मठात आयोजित ग्रंथ वितरण सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

समग्र महात्मा बसवेश्वर या महाग्रंथाच्या १०८ प्रतीचे वितरण हावगीस्वामी मठात शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करुन वाचकांना देण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना प्रा. सुदर्शन बिरादार पुढे म्हणाले की, आम्हाला महात्मा बसवेश्वरांचे चित्र माहिती झाले पण त्याचे चरित्र माहिती झाले नाही.९० कि मी वर बसवकल्याण आहे.तेथे राज्य करुन जगाला मार्गदर्शन व्हावे, असे कार्य केलेल्या महात्मा बसवेश्वरांचे विचार महाराष्ट्रात यायला ९०० वर्षे लागले.याला धर्मगुरू व राज्यकर्ते जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कन्नड भाषेत महात्मा बसवेश्वरांचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण मराठी भाषेत म्हणावे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्यामुळे मराठी भाषिक अनुयायांना महात्मा बसवेश्वर कळायला खुप वाट पहावी लागली.आता मात्र मराठी भाषेतील अनेक लेखक साहित्य निर्मिती करीत आहेत. समाजातील तरुणांना आवाहन करतो की, त्यांनीच आता आपली जबाबदारी समजून आपणच महात्मा बसवेश्वरांचे विचार अभ्यासुन ते जगाला सांगावेत.देशपातळीवर महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रचार व प्रसार करण्यासाठी दिल्ली येथे महात्मा बसवेश्वर मिशन ही संस्था असायला हवी.आज महाराष्ट्र सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांचे स्वागत केले.व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.ही घोषणा बोलाचाच भात असे होऊ नये, ही अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी ग्रंथाचे व लेखकाचे कौतुक केले.प्रा तानाजी सोनटक्के, सुभाष बिरादार, डॉ अंजुम कादरी, अँड एस टी पाटील, मल्लिकार्जुन करडखेलकर,धनंजय गुडसुरकर, नामदेव कदम,प्रा एम बी पठाण आदींची महत्वपूर्ण भाषणे झाली. यावेळी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, सतिश उस्तुरे,विजय स्वामी, प्रभुराज कप्पीकेरे, भिमराव शेळके, महेश धोंडीहिप्परगेकर, अशोक तोंडारे, प्रा काळगापुरे, बापुराव शेटकार, अमरनाथ मुळे, शांतवीर मुळे, महादेव हरकरे, भरत करेप्पा,निलेश हिप्पळगे,शिवराज रंडाळे, बसवराज ब्याळे प्रा व्ही एस हुडगे,धीरज माकणे, संजय शिवशेट्टे, शिवराज तोंडारे, यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बसवराज ब्याळे व बापुराव पटणे यांनी लिंगायत महासंघात प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष शंकरे, यांनी केले तर सुत्रसंचलन शिवसांब स्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश धोंडिहिप्परगेकर यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!