लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे पानिपत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – आ रमेशआप्पा कराड

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने धुर्तनीती अवलंबून विजय संपादन केला.कर्तुत्व आणि हिम्मत असती तर निवडणुकीत कुस्ती खेळायला हवी होती. मात्र पराभवाच्या भीतीने वेगळ्या मार्गाने जाऊन आमदारकी मिळवली. एका अर्थाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांची ही अवहेलना आहे, याचा आपण पाठपुरावा करून काँग्रेसचे पानिपत करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे विचार भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार रमेश आप्पा कराड यांनी व्यक्त केले.
रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर नल, नल से शुद्ध जल” योजनेचे भूमिपूजन, महात्मा गांधी रोहयो अंतर्गत रस्ता मजबुतीकरण, चिन्मयानंद स्वामी मठाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ, मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत समशान भूमी कडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली पेव्हर ब्लॉक रस्ता आदी 2 कोटी 21 लक्ष 77 हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भुमिपुजन झाले. यावेळी जाहीर कार्यक्रमातून आ. कराड बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुलाबराव माने हे होते. यावेळी भाजपाचे अमोल पाटील, भागवत सोट, अँड दशरथ सरवदे, वसंत करमुडे, अभिषेक अकनगिरे, सतीश आंबेकर, महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, प्रकाश रेड्डी, श्रीकृष्ण पवार, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, सरपंच रमेश कटके, उपसरपंच इंदुबाई माने, अनुसया फड, संध्या पवार, शिला आचार्य यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आ. रमेश आप्पा कराड म्हणाले की, आपण केवळ आश्वासनाची खैरात करणारे नेते नसून जनतेच्या सुखदुःखात सतत सहभागी होऊन विकासाचा आदर्श पॅटर्न प्रत्यक्ष राबवणारे जनतेचे सेवक आहोत. जनतेमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्या मध्ये आम्हाला आनंद आहे. त्यामुळेच या निवडणुकांमध्ये जनता काँग्रेसचे पानिपत करून त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रशासन आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विविध योजनांचा लाभ गरजूंना देत असल्याची माहिती सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, महाविकास आघाडीने अडीच वर्षात कोणतीच विकासाची कामे केली नाहीत. केवळ वसुलीचेच काम केले. भाजप सेना युतीच्या राज्य शासनाने अर्थसंकल्प जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले अस्वस्थ आहेत. गारपीट होऊन नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन आ. कराड यांनी यावेळी बोलताना दिले.
या कार्यक्रमास इंद्रठाणा सरपंच अविनाश रणदिवे, सुमठाणा सरपंच संतोष साखरे, घनसरगाव सरपंच महानंदा दरेकर, वंजारवाडी सरपंच पाटलोबा मुंडे, कुभारी सरपंच भीमराव मुंडे, समसापूरचे मदन चौधरी, बावची चे सरपंच नरर्सिंग चपटे, ज्ञानोबा भिसे, सदाशिव राठोड दर्जीबोरगाव ब्रह्मवाडी येथील अंकुश लोणकर, गोविंदराव माने, अमोल माने, पांडुरंग काळदाते, दत्ता सुरवसे, शेख निजाम, बालासाहेब सुरवसे, प्रदीप माने, बिभीषण सुरवसे, प्रशांत घोडके, भास्कर माने, केरबा काळदाते, पाशुमिया शेख, अनिल स्वामी, अनिल गाडेकर, भास्कर स्वामी, बाबुराव माने, गणेश भंडे यांच्यासह गावातील आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.