कर्नल शशिकांत दळवी यांना जल मंत्रालयातर्फे “जलप्रहरी पुरस्कार”
पुणे (केशव नवले) : दिल्ली येथे जल शक्ती मंत्रालया तर्फे झालेल्या सम्मान समारोह मध्ये जल शक्ती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुण्यातील कर्नल शशिकांत दळवी यांना “जल प्रहरी” पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात देशातील 40 जणांना जल प्रहरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना जल मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, जलसंधारणाच्या क्षेत्रात भारताचे योगदान विलक्षण आहे. पर्यावरण आणि जलसंवर्धनात भारताने फार कमी कालावधीत जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. भारताच्या लोकसंख्येच्या वाढीसह तिप्पट वाढलेल्या पाण्याच्या समस्येची गरज ही चिंतेची बाब आहे. आपण जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने आपल्या भावी पिढीसाठी पाणी वाचवण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.महाराष्ट्राकडून अजित पोवार, अभिजीत राऊत (IAS), संदीपकुमार साळुंखे (IAS), रवींद्र सिंघल (IPS), राजेश पंडित, दत्तू रामभाऊ ढगे, स्नेहल दोंदे, हनुमंत बाबूराव, पुण्याचे नागोराव सेंटर, चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावावर असलेल्या फाऊंडेशनचे मकरंद अनसुपारे, नांदेडचे मल्हार पाटेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, पुण्यातील शशिकांत दळवी यांना जलप्रहरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
पोलिस फ्लॅश न्यूजशी- कर्नल दळवी यांनी सवांद साधताना सांगितले की, सेवानिवृत्ती नंतरच्या 20 वर्षातील या प्रवासातीत हा खूप मोठा आणि सुखद टप्पा होता. आतापर्यंतच्या या प्रवासातील सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे, 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 4 गावे व 2022 मध्ये मराठवाडा, बीड जिल्ह्यातील 100 गावातील जवळपास 5 लाख लोकांना पाणी संकटातून मुक्त करू शकलो. या महत्वाच्या प्रवासात प्रकाश नायडू, अनिरुद्ध तोडकर यांचा सर्वात मोठा सहभाग आणि साथ मिळाली आहे. ICICI Bank ने आर्थिक सहाय्य केल्या मुळेच ग्रामीण भागातील ही कामे पूर्ण होवू शकली.
