कायद्याच्या शिक्षणातून सामाजिक जाणिवा प्रगल्भ होतात -ॲड.गौरव वाडियार, लंडन

कायद्याच्या शिक्षणातून सामाजिक जाणिवा प्रगल्भ होतात -ॲड.गौरव वाडियार, लंडन

उदगीर (एल.पी.उगीले) : कायद्यांमध्ये कोणताही विषय वर्ज्य नसतो. कायदा आणि समाज याचं नातं वेगळ्या स्वरूपाचे आहे.एखादे कार्य चांगले आहे का वाईट आहे? हे ठरविण्यासाठी कायद्याची गरज असते. इथे वैयक्तिक मताला फारसे महत्त्व राहत नाही. वकिली व्यवसायात विविध अंगी स्वरूपाचा अभ्यास चिकित्सकपणे करावा लागतो. एकंदरीत कायद्याच्या शिक्षणामुळे सामाजिक,तात्विक प्रश्न व समस्यांची जाणीव होते.असे विचार लंडन येथून ॲड.गौरव वाडियार यांनी व्यक्त केले.

येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने ध्यास यशाचा या उपक्रमांतर्गत आभासी पद्धतीने आयोजित व्याख्यानमालेच्या समारोप समारंभाचे पाचवे पुष्प लंडन येथून आभासी पद्धतीने ॲड.गौरव राजेंद्र वाडियार यांनी गुंफले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर होते,तर उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय समितीतील प्रा.जे.डी.संपाळे यांनी करून दिला.

भारतीय व पाश्चिमात्य शिक्षण : संधी यासंदर्भात बोलताना ॲड.वाडियार म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवायला हवा. वक्तृत्व व वादविवाद सारख्या विषयात संभाषण कौशल्याला वाव मिळतो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास असेल तरच समर्थपणे पुढे जाता येते.विदेशी शिक्षणामध्ये गुणवत्ते बरोबरच प्रॅक्टिकलला अधिक महत्त्व आहे. पुस्तकीय शिक्षणाबरोबरच अनुभव व प्रात्यक्षिक शिक्षणाला देखील महत्त्व देणे गरजेचे आहे. तसेच ज्या विषयाकडे कोणी पाहिलेले नाही, असा विषय संशोधनासाठी निवडल्यास निश्चितच त्या संशोधनाचा फायदा समाजासाठी व देशासाठी होईल.यावेळी त्यांनी कायदा कशासाठी, कोणासाठी , तसेच कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते? कायद्याचे शिक्षण कशा स्वरूपाचे असते? कायद्याच्या शिक्षणामध्ये व्यवसायाच्या संधी कोणकोणत्या दडलेल्या आहेत? या संदर्भामध्ये विस्ताराने भाष्य करीत आपला अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांशी दीर्घ संवाद साधून श्रोत्यांना अंतर्मुख केले.अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, ध्यास यशाचा या मालिकेतील व्याख्यानामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. कारण सर्व व्याख्याते हे नवोदित असून स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत.

आभासी पद्धतीने आयोजित कार्यक्रमास भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सदस्य मनीषाताई पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.लंडनहून मार्गदर्शन केल्याबद्दल ॲड.गौरव वाडियार यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे , कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे व संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीचे प्रमुख डॉ.एल.के.उलगडे,डॉ.डी.आर.होनराव, डॉ.म.ई.तंगावार डॉ. एम.एल.भंडारे, प्रा.जे.डी. संपाळे,प्रा. एम.व्ही. भालके, प्रा.एस.एस.स्वामी आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा.मनोहर भालके तर आभार डॉ.डी.आर.होनराव यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!