शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, महाविकास आघाडी पॅनलच्या ताब्यात द्या – आमदार बाबासाहेब पाटील

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, महाविकास आघाडी पॅनलच्या ताब्यात द्या - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) : कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पॅनलचा प्रचार शुभारंभ श्री क्षेत्र शिरूर ताजबंद येथील प्रभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होत करण्यात आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार बाबासाहेब यांनी नारळ फोडत प्रभू महादेवाच्या चरणी प्रार्थना केली.

शेतकरी बांधव हा माझा कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. आजवर त्यांच्या असणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढील काळातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्वजण कटिबद्ध आहोत, असे मत अहमदपूर येथील दिपवर्षा मंगल कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समिती, निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पॅनलचा प्रचार शुभारंभ प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी पॅनलच्या ताब्यात द्या, असे आवाहन देखील उपस्थित मतदारांना केले.

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव , ह.भ.प उत्तमजी महाराज धानोरकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांबजी महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष शिवाजीदादा देशमुख, शिवसेना ता.प्रमुख विलास पवार, माजी जि.प गटनेते मंचकराव पाटील, काँग्रेस माजी ता.अध्यक्ष माजी जि.प सदस्य ऍड.हेमंतराव पाटील, माजी सभापती चंद्रकांतजी मद्दे, जिल्हा सरचिटणीस इमरोज पटवेकर, काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन, विश्वंभरराव पाटील, शिवाजीराव खांडेकर, शिवसेना शहराध्यक्ष भारत सांगवीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजहर बागवान, संजय जी पवार, तुकाराम पाटील, सुरजभैय्या पाटील, बालासाहेब पाटील आंबेगावकर, अँड.टी.एन.कांबळे, विलासराव पवार, विनायकराव पाटील चोबळीकर, शेखर जाधव, विकास महाजन, प्रशांत भोसले, प्रा.व्ही.एस पवार, माधव पवार, शंकर गुट्टे, युवराजभैय्या पाटील, बळीराम इंगोले, अंकुशराव कानवटे, शाहूताई कांबळे, दिनानाथ राचमाळे, संतोष रोडगे, बाळू केंद्रे, बाळासाहेब साखरे, गोपीनाथ जोंधळे, युवराज घोगरे, प्रताप जाधव, महेश हंबीर, चंद्रकांत गंगथडे, शामराव टीकोरे, बालाजी रोकडे, सतीश नवटक्के, सतीशराव कल्याणी, अविनाश मंदाडे, उत्तमराव देशमुख, रफिक शेख, दिलदार शेख, प्रकाश ससाने, अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, अशोक सोनकांबळे, राजकुमार सोमवंशी, धनराज बोडके, शिवशंकर आगलावे, श्याम देवकते, माधव पवार, अनिल यादव पाटील, अविनाश देशमुख, शार्दुल शेख, सचिन पडिले, मच्छिंद्र वाघमारे, शरद पवार, माधव कासले, शिवा कासले, सुभाष गुंडीले, अजय सुरनर, अनिकेत फुलारी, वामनराव पाटील, बाळू पवार, बाळासाहेब बेडदे, हरिभाऊ कदम सर, बाळु भाऊ केंद्रे, सूर्यकांत चिघळे सर, शिवाजी पवार, विजय पवार, ज्ञानेश्वर शेळके, विष्णू सोमवंशी, बालाजी कातकडे, विजयकुमार लोहारे, व्यंकटराव पस्तापुरे, रामदास कदम, शुभम मुंडे, शैलेश जाधव, खंडू शेवाळे, संतोष कदम, भीमाशंकर दाभाडे, अरुण सूर्यवंशी, मधुकर जगताप तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल व सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!