अन्नसुरक्षा दिनाच्या निमित्त उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप

अन्नसुरक्षा दिनाच्या निमित्त उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील धसवाडी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिन हा अहमदपुर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार डी के मोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत धान्याचे वाटप करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिन केला साजरा.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे स्वस्त धान्य दुकानदार विकास देशमुख यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली असल्याने सध्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन चालू असल्याने राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य देण्याचे मंजूर केले आहे त्या अनुषंगाने धसवाडी येथे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पाच कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी पुढे बोलताना असे म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालल्याने जनता उपाशी राहणार नाही म्हणून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी लाभार्थ्यांना पाच किलो प्रमाणे ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य देण्याचे ठरवले आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपापल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले धान्य घेऊन जाण्यास सूचना केल्या आहेत.
धान्य वाटप लाभार्थी जाधव गंगाधर , हेमनर गंगाधर, पौळ विमलबाई, चंदेवाड शेषराव, क्षीरसागर विकास, या पाच लाभार्थ्यांना उपजिल्हाधिकारी व तहसीलदार अहमदपूर यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार विकास देशमुख, तलाठी भरतराव मुंडे, सरपंच प्रेमचंद दुर्गे ,शिवानंद चावरे अविनाश देशमुख, मुरलीधर देशमुख, चंद्रकांत देशमुख, रणजीत क्षीरसागर, ज्ञानोबा चंदेवाड, गंगाधर हेमनर, क्षिरसागर गुरुजी व गावातील नागरीक उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!