साईबाबा शुगरच्या आर्थिक व मानसिक त्रासास कंटाळुन ११ शेतकऱ्यांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा

साईबाबा शुगरच्या आर्थिक व मानसिक त्रासास कंटाळुन ११ शेतकऱ्यांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील शिंदगी(बु) येथील ११ शेतकऱ्यांनी साईबाबा शुगर लिमिटेड शिवनी ता औसा जि लातुर येथे गेल्या सहा महिन्यापुर्वी गळीत हंगाम 2O20 रोजी गाळपास घातलेल्या उसाचे 21 लाख रू अद्याप दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दि O2 जुन रोजी सामुहिक जलसमाधीचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
तालुक्यातील सिंदगी(बु) येथील आम्ही ११ शेतकऱ्यांनी 21 लाख रूपयेचा ऊस गळीत हंगाम 2O20 रोजी जवळपास सहा महीन्यापुर्वी साईबाबा शुगर लि साखर कारखाना शिवनी ता औसा जि लातुर येथे आपल्या शेतातील ऊस गाळपासाठी दिला होता व पंधरा दिवसात तुमच्या उसाचे पैसे देऊन टाकुत असे आश्वासन कारखान्यामार्फत देण्यात आले होते . त्यानूसार वजनप्रमाणे चेकसुद्धा कारखान्यामार्फत देण्यात आले आहेत संबंधित चेक आम्ही बँकेत लावले असता रक्कम शिल्लक नसल्यामुळे सदरील आमचे चेक परत आले . सदरील प्रकरणी आम्ही कारखान्याकडे चौकशी केली असता आठ पंधरा दिवसात तुमचे पैसे देऊन टाकुत असे आश्वासन मागील चार महिन्यापासून देत आहेत . सदरील प्रकरणी आम्ही मा.जिल्हाधिकारी लातूर , मा.तहसिलदार औसा , मा.तहसिलदार अहमदपूर यांना मागील तीन महिन्यापासून कळवुनही आम्हा शेतकऱ्यांची प्रशासन दखल घेत नाही.
सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीतून जात असताना आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे . आमच्यातील काही शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न व्याजी व उसनवारी पैसे काढुन मार्गी लावावे लागणार आहेत .आठ दिवसात येणाऱ्या पेरणीसाठी पैसे कोठुन आणायचे हा सतत चिंतेचा प्रश्न आम्हा शेकांना भेडसावत आहे . तरी वरील प्रकरणी दखल न घेणाऱ्या प्रशासनाच्या व साखर कारखान्याच्या मानसिक व आर्थिक त्रास्वला कंटाळुन आम्ही शेतकरी दि .02 / 06 / 2021 या रोजी मोघा साठवण तलाव ता.अहमदपूर येथे सामूहिक जलसमाधी घेणार आहोत . आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास आमच्या मृत्युस कारणीभूत जिल्हा प्रशासन व साईबाबा शुगरचे कार्यकारी संचालक राजेश्वर बुके , स्वप्निल बुके , स्वप्निल कुलकर्णी व चेतन ढोले हे राहतील असे निवेदन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना सामाजिक कार्यकर्ते शंकर मुळे यांच्यासह संबंधीत शेतकऱ्यांनी दिले असुन सदरील निवेदनावर शेतकरी सहदेव थावरे, दशरथ थावरे, तुळशीराम थावरे, माधव थावरे, मालु थावरे, बळीराम थावरे, तुकाराम मुळे, ज्ञानोबा मुळे, विनायक मुळे, अमोल मुळे, व्यंकट मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!