अहमदपूर बाजारपेठेत कैऱ्या विक्रीसाठी दाखल

अहमदपूर बाजारपेठेत कैऱ्या विक्रीसाठी दाखल

लोणच्यासाठी परराज्यातील कैरी ; गृहिणींची लगबग


अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील बाजारपेठेत कैऱ्या विक्रीसाठी दाखल होत असल्याने महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.सध्या महिला वर्गाची लोणचे टाकण्याची लगबग ही सुरु झाली आहे. दरवर्षीच्या पावसाळ्याच्या आधी लोणचे टाकण्याचे काम हे हाती घेण्यात येते. यंदा देखील हे काम हाती घेण्यात आले आहे. आता महाराष्ट्रासह परराज्यातील
विविध ठिकाणच्या कैऱ्या बाजार पेठेत विक्री साठी दाखल होवू लागल्या आहेत. लोणच्यासाठी लागणारे सर्व साहित्यासाठी बाजारपेठेत महिला वर्गाची पावले ही वळू लागली आहेत. प्रत्येक कुटुंबात भोजनाच्या ताटात हवेहवेसे वाटणाऱ्या चटकदार कैरीचे लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु आहे. आंबा म्हटलं कि कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय रहात नाही.
साधारणत: जून महिना सुरु असला की वर्षभर साठवूण ठेवता येईल, असे चटकदार कैरीचे लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरु असते. त्यासाठी आवश्यक असलेले हळद, तेल, मीठ, हिंग, मोहरीचे पीठ, मसाल्याची खरेदी करण्यास सुरुवात असते. सध्या येथील बाजारपेठेत लोणच्यासाठी कैरी विक्रीसाठी उपलब्ध असून ढीगच ढीग पहावयास मिळत आहेत. घरोघरी गृहिणींची लोणचे तयार करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. लोणच्यासाठीच्या कैऱ्यांना मागणी वाढली असून दर्जा, आकार यानुसार दर आकारण्यात येत आहे. साधारणत: ४० ते ५० रुपये किलो दराने कैरी उपलब्ध आहेत. तर कैरीच्या फोडी करण्यासाठी २० रुपयांस प्रति किलो असा दर आहे.बाजारातून विकत आणलेल्या कैरी घरी स्वच्छ पाण्यात टाकल्या जातात. दुसऱ्या दिवशी धुवून फोडणी केली जाते. त्यानंतर हळद, मीठ, हिंग, तेल व मसाला तयार टाकून लोणचे तयार केले जात आहे. लोणच्या चिनी मातीच्या बरणीचा उपयोग केला जातो. त्यामुळे या कालावधीत चिनी मातीच्या बरणीस मागणी आहे. सध्या बाजारपेठेत लोणच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच कैऱ्या फोडून देणाऱ्यांकडेही गर्दी दिसून येत आहे.


गेल्या वर्षी कैऱ्याचे भाव ६० ते ७० रुपये किलो असे दर होते. मात्र यावर्षी गेल्या वर्षापेक्षा
कैऱ्याचे दर कमीआहेत. महाराष्ट्रासह हैदराबाद, रायचुट्टी, दामणचूर, तिरुपती, बेंगलोर, श्रीनिवासपूर, कृष्णानगरी आदी ठिकाणहून कैऱ्या मागविल्या जात आहेत, असे येथील फळ विक्रेते जावेद फकीरसाब बागवान यांनी सांगितले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!