परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे केले स्वागत

परळी वैजनाथ ( गोविंद काळे ) : परळी केंद्र आशिया खंडातील नंबर 1 चे केंद्र म्हणून ओळखले जाते परळीच्या या पावन भूमीत वैद्यनाथांच्या या नगरीत परळी औष्णिक विद्युत केंद्र हे मानाचा तुरा म्हणून ओळखला जातो या औष्णिक विद्युत केंद्रातून महाराष्ट्राची विजेची भूक भागवून या करिता अहोरात्र परिश्रम घेऊन निर्मिती या केंद्रातून केली जाते अनेक उच्चांक प्रस्थापित केलेले आहे याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी परळी केंद्राला नुकतीच भेट देऊन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संघटना व कर्मचारी अभियंता अधिकारी यांचे अभिनंदन केले संच क्रमांक 6,7, 8 या तिन्ही संचातून जानेवारी ते मे दरम्यान या तिने संचातून क्षमतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती करून उच्चांक प्रस्थापित केला आहे याची दखल मुख्य कार्यालय सुद्धा घेऊन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगली वाटचाल परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मिती करून दाखवली आहे आहे त्याचबरोबर परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस दिनांक 12 6 2021 रोजी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत हा दुग्धशर्करा योगायोग घडून आल्याने मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आ.संजय दौंड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी हे उपस्थित होते. त्याच बरोबर या प्रसंगी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना शुभेच्छा देऊन परळी केंद्राची जबाबदारी व परळी केंद्राचा नावलौकिक करण्याकरिता पुढील वाटचालीस सस्नेह शुभेच्छा दिल्या. ऊर्जा मंत्री यांनी परळी केंद्र सतत चालू राहण्याकरिता जी काही मदत लागेल ती मदत करून परळी केंद्र अविरत वीज निर्मिती करेल अशी आशा व्यक्त संघटना प्रतिनिधी यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वस्तात स्वस्त कोळसा मिळावा ट्रान्सपोर्ट खर्चा मध्ये सुट देण्यात यावी जेणेकरून कमीत कमी दरात परळी केंद्रातून वीजनिर्मिती होईल अशा प्रकारची निवेदन देऊन मागणी केली त्याबाबतही ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक भूमिका दाखवून वीजनिर्मिती कमीत कमी दरात करण्याकरिता हवी ती मदत दिली जाईल अशा प्रकारचे आश्वासित केले. याप्रसंगी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सन्माननीय मोहन आव्हाड व सर्व अधीक्षक अभियंता ,अवचार, इंगळे ,राठोड ,नरवाड ,होळंबे सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व संघटना प्रतिनिधी सुधीर मुंडे ,डी एन देवकते ,हरिभाऊ गीते, वैजनाथ चाटे ,अरुण गीते व सहाय्यक कल्याण अधिकारी प्रभारी अविनाश जाधव त्याच बरोबर सर्व कर्मचारी अभियंता यांनी सर्वांन ऊर्जामंत्री यांचे आभार व्यक्त केले. तसेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे परभणी कडे रवाना झाले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!